मुंबई \ ऑनलाईन टीम
सध्या चर्चेत असणाऱ्या अदर पुनावाला धमकी प्रकरणावर भाजप नेते आशिष शेलार यांनी एक गौप्यस्फोट केला.सोमवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणावर मत मांडले.
भाजप नेते आशिष शेलार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले , या प्रकरणात अधिकृत भूमिका पुनावाला आणि केंद्र सरकारच घेऊ शकतात. पण, पुनावालांना सुरक्षा का मागावी लागली हा प्रश्न मात्र गंभीर असल्याचे देखील ते म्हणाले. कोणत्याही स्थानिक पक्षाचा या प्रकरणात हात असेल तर हे प्रकरण गंभीर आहे. सदर प्रकरणाबाबत आमच्याकडे काही माहिती उपलब्ध आहे. योग्य वेळ येताच ती सर्वांसरमोर आणली जाईल, तेव्हा यामध्ये ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार रहावं, अशा इशारा देखील शेलार यांनी यावेळी दिला.
भाजपला पश्चिम बंगालमध्ये पूर्ण विजय मिळाला नाही हे खरं आहे. पण, यशाचं मोजमाप करायचं झाल्यास यशाचा पगडा भाजपकडेच असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. कम्युनिस्ट रसातळाला गेले, काँग्रेसचं बाष्पीभवन झालं. ममता बॅनर्जी यांची म्हणावी तशी वाढ झाली नाही. मागील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशाचं मोजमाप भाजपकडेच आहे. आता या यशात दावेदार कोण, छुपे, उभे- आडवे हात कोणाते, हे ज्यांचं चिन्हं हात आहे यांनी ठरवावं असं देखील आशिष शेलार यावेळी म्हणाले.