दखल न घेतल्यास मोठ्या हानीची शक्यता
रजनीश जोशी/सोलापूर
गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे तुळजापूर तालुक्यातून सोलापूर परिसरात येत असलेल्या पावसामुळे सुप्तावस्थेत असलेल्या अदिला नदीला पाणी येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास बाळÎाच्या ओढयाला पूर येऊन तो परिसर जलमय होऊ शकतो. याची वेळीच दखल न घेतल्यास 2005 साली मुंबईत मिठी नदीमुळे जसा हाहाकार झाला होता, तशी स्थिती उद्भवू शकते.
724 चौरस किलोमीटर इतका भूभाग असलेली अदिला नदी तुळजापूर, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्मयातून वाहते. यासंदर्भात अदिला नदी पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील असलेले भूजलतज्ञ डॉ. अनिल नारायणपेठकर म्हणाले, तुळजापूर तालुक्मयातील माळुंब्रा, सुरतगावकडून वाहत येणारे पाणी हिप्परगा तलावात येते. त्याचप्रमाणे अन्य नाल्यांमधून ते सोलापूर जिह्यात येते. विशेषतः बाळÎाच्या ओढयात ते जमा होते. तिथे अदिला नदीचा प्रवाह आहे. विविध नाल्यांचे प्रवाह मिळूनच नदी वाहत असते. सध्याच्या पावसामुळे अदिला प्रवाहित होऊ शकते.
अदिला ही सीना नदीची उपनदी आहे. 56 गावांमधून ती वाहते. हिप्परगा तलाव याच नदीवर आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून अदिला नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्मयातील तेलगावजवळ नाल्याच्या रूपात अदिला नदी सीना नदीत मिसळते.
अदिलेला वर्षभर पाणी नसते. कारण विविध भागातून वाहत येणारे नाले एकत्र मिळून तिचा प्रवाह तयार होतो. पावसाळÎात नाल्यांमधील पाण्यामुळे नदी प्रवाहित होते. ही नदी वर्षभर प्रवाहित राहिली तर साठ गावांतील भूजलपातळी वाढू शकते. याबाबत मध्यंतरी डॉ. नारायणपेठकर, नरेंद्र काटीकर, प्रवीण तळे, स्वप्नील पेकम यांनी महापालिका उपायुक्त धनराज पांडे आणि खासदार डॉ. शिवाचार्य यांच्याशी चर्चा केली होती.
सोलापूर जिह्यात वादळी पावसाची शक्मयता
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. आज मंगळवारी सोलापूर जिह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जिह्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्मयता आहे.
साठ गावांना फायदा शक्मय – प्रवीण तळे
अदिला नदी पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते यशस्वी झाल्यास तुळजापूर आणि सोलापूर जिह्यातील साठ गावांना फायदा होऊ शकतो. त्यासाठी केंद्र सरकारसह स्थानिक यंत्रणांचे सहकार्य गरजेचे आहे.
प्रवीण तळे, संयोजक,
पर्यावरण संरक्षण गतिविधी
जलसंधारणाची कामे आवश्यक
एकरूख तलावातील गाळ संपूर्णपणे काढणे गरजेचे आहे. या नदीबाबत संपूर्ण आराखडा तयार आहे. त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. त्यावर जलसंधारणाची कामे गरजेची आहेत. तसे झाल्यास सोलापूर जिह्यासाठी हे मोठे काम होऊ शकेल.
डॉ. अनिल नारायणपेठकर, अदिला नदी संशोधन समितीप्रमुख, सोलापूर.