ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढायचा निर्णय घेतला, तर आंदोलन होणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, विरोधी पक्ष मराठा आरक्षणावरून राजकारण करीत आहे. मात्र, आम्हाला मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढला तर मार्ग निघेल. मला त्याबाबत कायदेशीर बाजू माहिती नाही, जर त्याबाबतचा पर्याय निघाला, तर मला वाटतं कोणीही रस्त्यावर उतरणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
- कंगना प्रकरण : सरकारचा काही संबंध नाही
कंगना प्रकरणी बोलताना शरद पवार म्हणाले, या प्रकरणात सरकारचा काही संबंध नाही. कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. माझ्या माहितीनुसार, महापालिकेच्या कायद्यानुसार ही कारवाई झाली आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी महापालिकेची आहे, यामध्ये सरकारचा काही संबंध नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.