ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आले.
अनंतनागच्या काही भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दल आणि पोलिसांना यश आले.
दरम्यान, दक्षिण काश्मीरमध्ये 29 विदेशी दहशतवादी कार्यरत असल्याची माहिती जम्मू पोलिसांना मिळाली आहे. त्यांची खात्रीपूर्वक माहिती आणि ठावठिकाणा समजल्यास त्यांचाही खात्मा करू, असे जम्मू पोलिसांनी म्हटले आहे.