गावात आरोग्य कमिटीची स्थापना, व्यापारी बंधू तसेच सामाजिक कार्यकर्ते करणार ऑक्सीजन सिलेंडरसाठी मदत
प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ येथे जनता कर्फ्यू संदर्भात रविवारी सकाळी आदिनाथ भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. योवळी गावातील व्यापारी बंधू तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, राकेश पलंगे, विनायक गुंजटकर, वसंत ताहशीलदार, बाळू कदम, बी. ओ. येतोजी, कॅप्टन कानडीकर, मुल्ला वकील उपस्थित होते.
बाळू कदम यांनी सर्वांचे स्वागत केले आणि बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर उपस्थित नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गेल्या मार्च महिन्यापासून देशात आणि शहरात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर बहुतांश व्यापार उद्योगधंदे बंद अवस्थेत होते. अनगोळ तसेच उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील बाहेरगावचे कामगार उपासमारीच्या भीतीने गेले ते फिरकलेच नाहीत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत कामगार तुटवडा जाणवत आहे. तसेच सततच्या लॉकडाऊनमुळे रोजच्या कमाईवर जगणाऱया लोकांची संख्या वाढली आहे. गवंडी, सेंट्रींग, रिक्षाचालक, तसेच रोजंदारीवर काम करणाऱयांच्या हाताला काम नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरात व आसपासच्या परिसरात बंद पडलेली कामे देशात आलेली आर्थिक मंदी यामुळे अनेक युवकांच्या नोकऱया गेल्या आहेत. त्यातच कोरोनाची वाढती भीती यामुळे परगावी उद्योगधंद्यासाठी गेलेले नागरिक किंवा इतर राज्यात कंपनीमध्ये काम करणारे युवक यांच गेलेली नोकरी यामुळे गावातील बऱयाच युवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यातच वाढती महागाई यामुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सध्या हळुहळू परिस्थिती बदलत चालली असली तरी म्हणावी तशी सुधारत नसलयाने सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन करणे योग्य नसल्याचे अनेकांनी मते व्यक्त केली. माजी नगरसेवक राकेश पलंगे यांनी आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला. लोकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी किंवा इतर आजारांवर डॉक्टरांनी रुग्णांना तपासून त्यांची योग्य तपासणी करावी, तसेच सर्व दवाखान्यामध्ये तपासणीसाठी येणाऱया रुग्णांना बसण्यासाठी खुर्च्यांची सुविधा उपलब्ध कराव्यात, वाटल्यास समोर मंडप उभारण्यात यावा आणि नागरिकांची सोय करावी, अशी मागणी केली.
राजू पवार यांनी गावातील प्रत्येक हॉटेल कामगारांचा प्रश्न उपस्थित केला व हॉटेलचालकांच्या समस्या मांडल्या. तर नंदू हेब्बाळकर, शंकर बिर्जे, जितू देवन यांनी लॉकडाऊन हा सध्याच्या काळात पर्याय नसल्याने गावातील आजारी नागरिकांना योग्य उपचारासाठी गावात चांगली आयोग्य सेवा आणि एखाद्या दहा खाटांचा चांगल्या दावाखान्याचा पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात आपले मत मांडले. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी गावामध्ये दररोज संध्याकाळी धर्मवीर संभाजी चौक येथील भाजी मार्केटमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा उडत असल्याने नागरिकांनी खरेदी विक्री करताना सामाजिक अंतराचे भान ठेवून व्यवहार करावा. कोणत्याही दुकानात गर्दी करू नये, एकमेकांत अंतर ठेवावे, तोंडावर मास्क लावावे आणि गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले. वसंत ताहशीलदर यांनी गावामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. पण शहरात बहुतेक मोठे दवाखाने हे कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यात आल्याने रक्तदाब, मधुमेह, डेंग्यू ताप, मलेरिया अश्या आजारांवर रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने गावातील वयस्कर नागरिकांची योग्य ती काळजी खबरदारी कुटुंबीयांनी घ्यावी, असे आवाहन केले. आणि गावात जनता कर्फ्यू न करता गावामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
अनगोळ आरोग्य सेवा कमिटीची स्थापना
अनगोढ गावामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे. पण वयस्कर लोकांच्या जुन्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत, कारण या आजारासाठी कोठेच हास्पिटल ऑक्सीजन, व्हेंटीलेटर मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांच्यासाठी गावातच ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
यामध्ये माजी महापौर व नगरसेवक किरण नायनाक, विनायक गुंजटक। अनिल मुचंडीकर, राकेश पलंगे, मोहन भांदुर्गे, राजू पवार, जितेंद्र देवण, अरुण गावडे, नंदु हेब्बाळकर, मुल्ला वकील, शंकर बिर्जे, प्रफल्ल सोमणाचे, दिपक सोमनाचे , अमित हलगेकर, उमेश भांदुर्गे, प्रशांत जाधव, बाळू रेडेकर, लक्ष्मण बजंत्री यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून बी. ओ, येतोजी, कॅप्टन कानडीकर, वसंत ताहशीलदार, बाळू कदम, राजू भेंडीगेरी, लक्ष्मण देमजी, जोतिबा लाटूकर, नंदा गौंडाडकर, गजानन चौगुले, यांची निवड करण्यात आली,
मंगळवारी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देणार
अनगोळ भागामध्ये कोरोना महामारीत आठ ते दहा खाटांचे एक तात्पुरते हॉस्पिटल, गावात डेंग्यू, मलेरिया, यांचे प्रमाण वाढले असून गावात औषध फवारणी करावी, अनगोळ अर्बन आरोग्य केंद्रात स्वॅब तपासणीची सुविधा उपलब्ध करावी, कोरोना पेशंटच्या संपर्कातील नागरिकांच्या बरोबरच इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी विविध हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याआधी होणारी स्वॅब टेस्ट अनगोळ सरकारी दवाखान्यात करण्यात यावी, अशा विविध मागण्यासाठी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
श्रीकांत कदम, राजू पवार, शंकर बिर्जे, राजु भेंडीगेरी, बी. ओ. येतोजी, कॅप्टन कानडीकर, मुल्ला वकील, नंदु हेब्बाळकर, अरुण गावडे, जितु देवण, राकेश पलंगे, प्रफुल्ल सोमणाचे, भाऊ कावळे, राजू शिंदोळकर, बसू पाटील, दिपक सोमनाचे, विनायक बांगाळे, नंदकुमार गौंडाडकर, गजानन चौगुले, राजेश, अणवेकर, सदानंद लाटुकर, परशराम नलवडे, तसेच गावातील बहुसंख्य व्यापारी बंधू तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.