प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील कलमेश्वर मंदिर येथे दरवषी श्रावण महिन्यामध्ये महाप्रसाद (परव) याचे आयोजन केले जाते. मात्र यावषीही कोरोनामुळे तसेच प्रशासनाच्या नियमावलीमुळे महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कलमेश्वर कमिटीच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार दि. 30 ऑगस्टपासून शुक्रवार दि. 3 सप्टेंबरपर्यंत पाच दिवस गावात वार पाळवणूक करण्यात येणार आहे.
दरवषी श्रावण महिन्यामध्ये कलमेश्वर मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यंदाही सोमवार दि. 30 रोजी याचे आयोजन करण्यात येणार होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच तिसऱया लाटेचा धोका जाणून खबरदारी घेण्यात आली आहे. कारण महाप्रसादाच्यावेळी मोठी गर्दी होण्याची शक्मयता आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. महाप्रसाद रद्द झाला तरी गावामध्ये वार पाळवणूक केली जाणार आहे. महाप्रसादाच्या नावाने कोणीही वर्गणी जमा करु नये, असे आवाहनही कमिटीने केले आहे.