प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ मुख्य रस्त्यावरील पथदीप बंद असल्याने रात्रीच्यावेळी ये-जा करणाऱयांना त्रास होत आहे. एकतर अनगोळच्या आतील भागातील पथदीप बऱयाचदा 24 तास सुरू असतात. तर दुसरीकडे मुख्य रस्त्यावरील वीज गायब असते.
सध्या प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे वर्दळ कमी असली तरी तातडीच्या सेवेसाठी ये-जा करणाऱयांची अंधारामुळे गैरसोय होत आहे. याबाबत सातत्याने संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने लोकांना अंधारातच वावरावे लागत आहे.
स्मार्ट सिटीचे संचालक शशिधर कुरेर आणि महानगरपालिकेचे आयुक्त जगदीश या तक्रारीची दखल घेतील का? हा प्रश्न आहे. शहराच्या बऱयाच भागात पथदीप बंद असतात. याचा परिणाम सर्वसामान्यांवर व प्रामुख्याने पादचाऱयांवर होतो. हे अधिकाऱयांनी लक्षात घ्यावे, अशी मागणी होत आहे.