प्रतिनिधी /बेळगाव
कलमेश्वर गल्ली, अनगोळ येथील एक युवक गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी शुक्रवारी त्याच्या पत्नीने टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
शिवानंद मल्लाप्पा कोणी (वय 39, मुळचा रा. परकनट्टी, ता. हुक्केरी, सध्या रा. कलमेश्वर गल्ली, अनगोळ) असे त्याचे नाव आहे. दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता उद्यमबागला कामावर जाण्याचे सांगून हा युवक आपल्या घराबाहेर पडला आहे. तो अद्याप घरी परतला नाही. शिवानंदविषयी कोणाला माहिती मिळाल्यास टिळकवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.