प्रतिनिधी / बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अनगोळ विभाग यांच्यावतीने बलिदान मास मागील फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या दरम्यान संपूर्ण एक महिना आचरण्यात आला. सोमवारी सायंकाळी बलिदान मासची सांगता धर्मवीर संभाजी महाराज चौकात झाली.
सोमनाथ मंदिर येथून रविवारी संभाजी ज्वाला आणण्यात आली. अनगोळ मुख्य रस्ता, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, जय महाराष्ट्र चौक, लक्ष्मी मंदिर, गांधी स्मारक, लक्ष्मी गल्ली, कलमेश्वर गल्ली, मारुती मंदिर, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, संत रोहिदासनगर, रघुनाथपेठ येथील मारुती मंदिर येथे ज्वाला ठेवण्यात आली.
यावेळी गावातील माता, भगिनींनी संभाजी ज्वालेचे दर्शन घेऊन औक्षण करून पूजन केले. सोमवारी सायंकाळी रघुनाथपेठ मारुती मंदिर येथून प्रेरणामंत्र म्हणून संभाजी ज्वालेचे पूजन करून मूकपदयात्रेला सुरुवात केली. रघुनाथपेठ, जय महाराष्ट्र चौक, भांदूर गल्ली, सुभाष गल्ली, पाटील गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, त्यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथे ज्वाला शांत करण्यात आली.
धारकऱयांना मार्गदर्शन
फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्येदरम्यान संपूर्ण महिना बलिदान मासचे आयोजन करण्यात आले. यावेळी कणबर्गी गावातील शिवप्रतिष्ठानच्या धारकऱयांनी शिवशंभू यांच्या बलिदान मासबद्दल धारकऱयांना मार्गदर्शन केले. देशावर जे संकट आले ते संकट दूर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. धर्मासाठी आपले बलिदान दिले. ते कोणत्याच आमिषाला बळी पडले नाहीत. हालहाल करून त्यांचा छळ करण्यात आला. याची प्रत्येक शिवभक्तांनी जाणीव ठेवली पाहिजे. यावेळी मोठय़ा संख्येने धारकरी उपस्थित होते.