बेळगाव : अनगोळ शिवारात दररोजच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.काळा तलाव परिसरातील शेकडो एकरमध्ये गाजर, फ्लॉवर कोबी, कोथिंबीर, मेथी आदी पालेभाज्या करण्यात आल्या आहेत. मात्र, शेतात पाणी साचल्याने त्या कुजून जाणार असल्याने शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चक्री वादळानंतर सलग चार दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कृषी खात्याने पाहणी करून अनगोळ परिसरातील शेतकऱयांना प्रशासनातर्फे नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी शेतकऱयांनी मागणी केली आहे.
Previous Articleदिल्लीतील कोरोना : दीड महिन्यानंतर समोर आले सर्वात कमी नवे रुग्ण
Next Article युवासेनेच्या कार्याची प्रशंसा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.