3 वर्षांनी दोघांनी घेतला वेगळे होण्याचा निर्णय
अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांच्या चाहत्यांचं मन मोडणारे वृत्त समोर आले आहे. 3 वर्षांपर्यंत परस्परांना डेट केल्यावर आता या कपलचे ब्रेकअप झाले आहे. खाली पीली या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. मागील काही काळापासून हे कपल स्वतःच्या नातेसंबंधांवरून अत्यंत व्यक्त होणारे राहिले आहे.
बेकअप करण्याचा निर्णय दोघांनी परस्पर सहमतीने घेतला आहे. ब्रेकअपनंतरही दोघांमध्ये मैत्रीचे नाते कायम राहणार आहे. तसेच भविष्यात एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यास दोघेही तयार असतील. दोघेही या ब्रेकअपला समजंसपणे आणि प्रगल्भतेसह सामोरे जाऊ इच्छितात.
दोघांदरम्यान सामंजस्याचा अभाव होता याचमुळे हे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. दोघांचाही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. याचमुळे दोघांनी स्वतःच्या वाटा वेगवेगळय़ा केल्याची चर्चा आहे. अनन्या आणि ईशान दोघेही अनेकदा परस्परांसोबत दिसून आले होते. ईशानने काही दिवसांपूर्वी स्वतःचा भाऊ शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत अनन्याला आमंत्रित केले होते.
अनन्याचा ‘गहराइयां’ हा चित्रपट अलिकडेच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अनन्यासोबत दीपिका पदूकोन, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य कारवां हे दिसून आले. तर ईशान लवकरच कॅटरिना कैफसोबत ‘फोन बूथ’ चित्रपटात झळकणार आहे.