ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
कोरोना संसर्गामुळे मागिल सुमारे दिड वर्ष देशातील नागरीकांना सार्वत्रिकरित्या फिरण्यास मर्यादा होत्या. यानंतर मात्र कोरोना संसर्गस्थिती काहीशी पुर्वपदावर आली आहे. यामुळे नागरिक रोजगाराच्या निमित्ताने अथवा इतर कारणासाठी बाहेर पडू लागले आहेत. याच पार्श्वभुमीवर कोरोनानंतर सर्वकाही रुळावर येत असतानाच देशाची राजधानी दिल्लीत मात्र पुन्हा महिलांवरील अत्याचार वाढू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गुन्ह्यांमध्ये ६ ते २० टक्के वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीनुसार, अनलॉकनंतर विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याबाबत मिळालेल्या आकडेवारीनुसार देशाची राजधानी दिल्ली येथील ९७ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी पीडितांना ओळखत होते, तर सुमारे २ टक्के बलात्कार अनोळखी व्यक्तींकडून झाल्याची नोंद झाली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत १,४२९ बलात्काराचे गुन्हे नोंदवले आहेत, तर2021ऑक्टोबरपर्यंत १७२५ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यावरुन विनयभंगाच्या घटनांमध्ये २०.४४ टक्के वाढ झाली आहे. तसेच या वर्षी ऑक्टोबरपर्यंत विनयभंगाचे २,१५७ गुन्हे दाखल झाले असून गेल्या वर्षी १,७९१ गुन्हे दाखल झाले होते.