प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचे सातारा जिह्यात दीडशे ती पावणे दोनशे रुग्ण आढळून येत आहेत. प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भीती असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दोन दिवसांपुर्वी अनलॉक नियम पाळून जाहीर केले आहे. परंतु सातारकरांनीही घराबाहेर पडणेच नापसंद केल्याचे दिसत आहे. सकाळी 10 वाजता शहरातील दुकाने उघडली होती. त्यातील मोबाईलच्या दुकानावर मोबाईल खरेदी व दुरुस्तीकरता झुंबड उडल्याचे दिसत होते. भाजी विक्रेत्यांची दुकाने सकाळीच मांडली होती. त्यांनी सोशल डिस्टन्स ठेवूनच ग्राहकांना माल देताना दिसत होते. रक्षा बंधनचा सण अवघ्या दोन दिवसावर आल्यामुळे आपल्या भावाला राखी पाठवण्यासाठी बहिणींकडून कुरिअर कार्यालयात विचारणा करण्यात आली. परंतु कुरिअरची सेवाच कोलमडल्याचे दिसत होते.
तब्बल पावणे चार महिने लॉक लागलेली दुकाने आज 1 ऑगस्टला उघडण्यात आली. शहरात यापूर्वी लॉकडाऊनच्या अटी शिथील झाल्या होत्या. तेव्हा काहीं व्यापाऱयांनी भीतभित आपली दुकाने उघडली. परंतु त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यात स्टेशनरी, कटलरी, होलसेल, कापड दुकानदारांनी घाई केली नाही. जिल्हाधिकारी जे जे आदेश देत होते. त्यांची अंमलबजावणी केली जात होती. यामध्ये जिल्हाधिकाऱयांनी आदेशानुसारच सकाळी सातारा शहरातील व्यापाऱयांनी दुकाने उघडली. टाळे खोलताना काही दुकानदारांना स्वच्छता करण्यापासून दुकानात काही मोडतोड नुकसान झाले आहे याची माहिती घेत. दुकानातील माल व्यवस्थीत लावून घेतला. त्यानंतर कुठे कचाटय़ात अडकू नये म्हणून ग्राहकांना सोशल डिस्टन्स ठेवण्याबाबत सुचना दुकानदार करत होते.शहरातील पोवई नाका कासट मार्केट, राजपथ, राजवाडा, राजधानी टॉवर, सातारा बसस्थानक परिसरातील व्यापाऱयांनी आपली दुकाने उघडली होती. परंतु दुकानामध्ये ग्राहक एवढे दिसत नव्हते. केवळ मोबाईलच्या दुकानात ग्राहक मोबाईल खरेदी आणि दुरुस्तीकरता दिसत होते. अगदी झुंबड काही मोबाईल विक्रीच्या दुकानात दिसत होती.
डबल सीट दुचाकीधारक फिरत होते
जिल्हाधिकाऱयांनी काढलेल्या आदेशात डबलसीट फिरायला परवानगी दिली असली तरीही हेल्मेट आणि मास्क यांची सक्ती केली आहे. दुचाकीधारक हेल्मेट विनाच फिरत होते. मास्क प्रत्येकजण घालत होते. वाहतूक शाखेकडून हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात येत होती. सायंकाळी उशीरापर्यंत अनेक दुचाकीचालकांवर दंडाचा मेसेज मोबाईलवर पाठवला जात होता.
प्रत्येकजण काळजी घेताना दिसत होता
सातारा शहरात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत असल्याने प्रत्येक जण काळजी घेत होता. काहीजण दुर्लक्ष करत असले तरीही त्यांच्या मनात कोरोनाची भीती दडलेली पहायला मिळत होती. हस्तांदोलन टाळून नमस्कार करण्यात होते.काही ठिकाणी गर्दी झाल्याचे पहायला मिळत होते. पोलीस वाहतुक वळवत होते.