वृत्तसंस्था/ कानपूर
उत्तरप्रदेश आणि तामिळनाडू यांच्यातील रणजी स्पर्धेचा इलाईट ब गटातील सामना सोमवारी येथे अनिर्णित अवस्थेत संपुष्टात आला. या सामन्यात तामिळनाडूने पहिल्या डावात उत्तरप्रदेशवर घेतलेल्या आघाडीमुळे 3 गुण मिळविले.
या सामन्यात तामिळनाडूने पहिल्या डावात 180 धावा जमविल्या. त्यानंतर उत्तरप्रदेशचा पहिला डाव 175 धावांत आटोपला. सामन्यातील खेळाच्या शेवटच्या दिवशी उत्तरप्रदेशला तामिळनाडूच्या पहिल्या डावातील धावसंख्येशी बरोबरी करण्याकरिता 11 धावांची जरूरीहोती. उत्तरप्रदेशने 9 बाद 170 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा पहिला डाव 175 धावांवर आटोपला. तामिळनाडूतर्फे मध्यमगती गोलंदाज टी. नटराजनने 24 धावांत 4 गडी बाद केले. त्यानंतर तामिळनाडूचा दुसरा डाव 154 धावांवर आटोपला. बाबा अपराजित 53 धावा जमविल्या. उत्तरप्रदेशच्या सौरभकुमारने 39 धावांत 5 बळी घेतले. सामन्याच्या शेवटी दुसऱया डावात उत्तरप्रदेशने 2 बाद 42 धावा जमवित हा सामाना अनिर्णित राखला. या सामन्यात उत्तरप्रदेशला 1 गुण मिळाला. तामिळनाडूचा या स्पर्धेतील पुढील फेरीतील सामना 11 जानेवारीपासून चेन्नईत मुंबई संघाबरोबर होणार आहे तर उत्तरप्रदेशचा पुढील सामना बडोदा संघाबरोबर कानपूरमध्ये होईल.
संक्षिप्त धावफलक
तामिळनाडू प. डाव- 180, उत्तप्रदेश प. डाव 175, तामिळनाडू दु. डाव 154, उत्तरप्रदेश दु. डाव 2 बाद 42.
हिमाचल प्रदेश प. डाव- 175, मध्यप्रदेश प.डाव 9 बाद 427 डाव घोषित, हिमाचल प्रदेश दु. डाव 5 बाद 185, सामना अनिर्णित, मध्यप्रदेश 3 गुण, हिमाचल प्रदेश 1 गुण.