मुंबई / ऑनलाईन टीम
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव चर्चेत आहे. महाराष्ट्राचे राजकारणात या आरोपामुळे चांगलेच तापले आहे. आरोपाची मालिका सुरूच आहे. याप्रकरणी परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत सीबीआय चौकशीची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं आहे. या सर्व घडामोडीनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केले आहे.
अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते. अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आलेल्या पत्राचा फोटोही ट्विटमध्ये जोडला आहे. यासोबतच अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आलेल्या पत्राचा फोटोही ट्विटमध्ये जोडला आहे.
परमबीर सिंग यांनी गृहरक्षक दलात केलेली बदली अन्यायकारक असून ती रद्द केली जावी तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित खंडणीवसुलीची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकेत केली होती. याप्रकरणी परमबीर सिंग यांची याचिका दाखल करुन घेण्यास नकार देत उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.