प्रतिनिधी/ मुंबई
माजी गफहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनंतर ईडीने गुन्हा दाखल केल आहे. ईडीने ईसीआयआर (एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट) दाखल केला आहे.
परमबीर सिंग यांनी देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला. तर या गुह्याच्या अनुषंगाने आता ईडीनेही तपास सुरु केला आहे. या आरोपानुसार पैशांची अफरातफर झाली का? याची चौकशी ईडी करणार आहे.
लवकरच देशमुखांना ईडी कार्यालयात जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात येणार आहे. ते दोषी आढळल्यास अटकेची कारवाई होऊ शकते. त्यांच्या स्विय सहायकांचीदेखील चौकशी ईडी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ईसीआयआर म्हणजे काय?
ईडीने तपास सुरु करण्यापूर्वी नोंदवलेला पहिला अधिकृत दस्ताऐवज म्हणजेच एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट, जो ईसीआयआर म्हणून ओळखला जातो. एखाद्या गुह्यात चौकशी सुरु करण्यापूर्वी पोलीस प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवतात, त्याच प्रकारे मनी लाँड्रिंगच्या गुह्याची माहिती मिळताच ईडी ईसीआयआर नोंदवते. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर ईडीची वकदृष्टी झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
ईडीच्याही चौकशीला सहकार्य करणार
मला मीडियाच्या माध्यमातून ईडीकडून चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. न केलेल्या गुन्हय़ाची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतुपोटी सुरु आहे. गफहमंत्री असताना काही महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे पेंद्र सरकार नाराज असून शकते आणि त्यामुळे माझी चौकशी सीबीआय व ईडीच्या माध्यमातून होत आहे. पण ‘सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही’, असे सांगत अनिल देशमुख यांनी ईडीच्या चौकशीला सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे.
सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान ः नवाब मलिक
अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयनंतर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. हे त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.