मुंबई / प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून रामदास कदम पक्षांतर्गत संघर्ष सुरू असून फडणवीस सरकार असताना कदम यांच्याकडे मंत्रीपद होतं त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळाल नाही. त्याशिवाय विधानपरिषदेवर ही त्यांना डावलण्यात आल्याने रामदास कदम नाराज असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभुमीवर रामदास कदम यांनी पक्तकार परीषद घेउन अनिल परब आणि उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला.
“अनिल परब यांनी आपलं वारंवार वृत्तपत्रात माझ्या विरोधात बातम्या देऊन त्या शिवसेनाप्रमुखांना दाखवल्या” ” मला राजकारणातून संपवण्याचा डाव परबांनी आखला असून मी किरीट सोमय्या यांनी कधीही संपर्क साधला नाही” “परबांनी दोन वर्षात माझा एक फोनसुद्धा घेतला नाही.” “अनिल परब यांनी आपला जिल्हा वाऱ्यावर सोडलाय” “परब हे मनसेचे महात्मा गांधी असून अनिल परब हाच खरा शिवसेनेचा गद्दार आहे” “शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आहेत की अनिल परब ?”
अशा शब्दात माजी मंत्री रामदास कदम यांनी अनिल परब आरोप करून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तसेच “भगव्या झेंड्याची साथ कधीच सोडणार नाही मी मरेपर्य़त शिवसैनिक राहीन” असेही ते म्हणाले.