डिझेल परतावा, तौक्ते नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
खराब हवामानामुळे गेले काही दिवस विस्कटलेली मच्छीमारांची घडी पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आह़े शहरातील मिरकरवाडा बंदर येथे चांगल्या प्रमाणात पापलेटसह कोळंबी मिळू लागल्याने मच्छीमारांना दिलासा मिळाला आह़े
ऑगस्टमध्ये मासेमारी हंगाम चालू झाल्यापासून खराब हवामानामुळे मच्छीमारांना अपेक्षित मासळी मिळत नव्हत़ी यामुळे मासेमारीसाठी होणारा खर्चही वसूल होत नव्हता. त्यातच मिळणाऱया मासळीला कमी वजनामुळे अपेक्षित भावही मिळत नसल्यामुळे येथील मच्छीमार हैराण होत़ा खराब हवामान, पाण्याला करंट यामुळे मच्छीमारांची जाळी फाटूनही नुकसान होत होत़े मात्र ऑगस्टच्या अखेरच्या टप्प्यात समुद्रात समाधानकारक कोळंबी, बांगडे तसेच पापलेट मासळी मिळत असल्याची माहिती येथील मच्छीमारांनी दिल़ी कोळंबीला 200 ते 400 रुपये किलो, बांगडा 150 ते 200 रुपयांना 5 ते 6 नग, तर पापलेटला आकार व वजनानुसार समाधानकारक दर मिळत आह़े
मदत निधी मिळण्यास विलंब
तौक्ते चक्रीवादळाची नुकसान भरपाई एका राष्ट्रीयकृत बँकेमार्फत मच्छीमारांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आह़े मात्र या बँकेकडून निधी वितरणात 10-15 दिवस वेळ काढला जात असल्याची तक्रार मच्छीमारांनी केले आह़े सिंधुदुर्ग जिह्याचा केवळ 1 वर्षाचा डिझेल परतावा बाकी आह़े परंतु रत्नागिरी जिह्याचा 3 वर्षाचा डिझेल परतावा अडकल्यामुळे हा अनुशेष लवकरात-लवकर भरुन काढण्याची मागणी मच्छीमारांनी केली आह़े मत्स्य व्यवसाय खाते, कोषागार कार्यालय तसेच तहसीलदार कार्यालय मच्छीमारांना योग्य ते सहकार्य करत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे.