3 किलो तांदुळ – 2 किलो ज्वारी मिळणार
प्रतिनिधी/ बेळगाव
बीपीएल रेशनकार्ड धारकांना सध्या लॉकडाऊनमुळे वाढीव प्रमाणात तांदूळ देण्यात येत आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकारवतीने तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. मात्र यापुढे अन्नभाग्य योजनेतील तांदुळ वाटपात कपात करण्यात येणार आहे. सध्या बीपीएल कार्डधारकांना प्रत्येक सदस्यामागे 10 किलो तांदुळ (केंद्र व राज्य सरकार मिळून) देण्यात येत असून यामध्ये राज्य सरकारवतीने पाच किलो तांदुळ पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यापुढे तीन किलो तांदुळ देण्यात येणार आहे. येत्या जुलैपासूनच याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनमुळे बीपीएल तसेच अंत्योदय रेशन कार्ड धारकांना तांदुळ प्रमाणात वाढ करण्यात आली होती यामुळी राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढला होता. हा भार कमी करण्याच्या दृष्टीने कार्ड धारकाला देण्यात येणाऱया तांदळाचे प्रमाण दोन किलोने कमी करण्यात येणार आहे. सध्या बीपीएल कार्ड धारकांचे प्रत्येक सदस्यामागे दहा किलो तांदूळ देण्यात येत आहे. तर दोन किलो गहू व दोन किलो तुरडाळ (जूनमध्ये) देण्यात आली होती. यापुढे प्रत्येक सदस्यामागे तीन किलो तांदुळ, दोन किलो ज्वारी आणि प्रत्येक कार्डासाठी दोन किलो गहू देण्यात येणार आहे. मात्र याबाबत अन्न व नागरिपुरवठा खात्याच्या कार्यालयास अद्यापही अधिकृत आदेश आला नाही. दक्षिण कर्नाटकातील कार्डधारकांना दोन किलो नाचणा तर उत्तर कर्नाटकातील कार्डधारकांना दोन किलो ज्वारी देण्याची योजना आहे.
कार्डधारकांना मोठय़ा प्रमाणात तांदुळ वाटप करण्यात येत असल्याने बऱयाच ठिकाणी रेशनवरील तांदळाचा काळा बाजार सुरु आहे. प्रमाणापेक्षा ज्यादा तांदुळ देण्यात येत असल्याने असंख्य कार्डधारकांकडून हे तांदूळ 10 ते 12 रुपये किलो दराने खुल्या बाजारात विक्री करण्यात येत आहे. तांदळाचा हा काळा बाजार रोखण्यासाठी यापुढे रेशनवरील तांदळाचे प्रमाण कमी करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयानी सांगितले.