जवळपास 15 हजार जणांना मिळणार रोजगार
नवी दिल्ली :
केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया क्षेत्रातील(फूड प्रोसेसिंग) जवळपास 29 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, अशी माहिती अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये प्रकल्पात 500 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच योजनेतून 15 हजारपेक्षा अधिक जणांना रोजगार प्राप्तीचे संकेत आहेत. या प्रकल्पासाठी सरकारने 204 कोटी रुपयांचा निधी दिल्याचेही स्पष्ट केले आहे.
अन्न प्रक्रिया मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली अंतर मंत्रालयीन अप्रुव्हल समितीने (आयएमएसी) 21 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामधील प्रकल्पासाठी 443 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
शेतकरी-ग्राहकांना लाभ
सदरच्या अन्न प्रक्रिया प्रकल्पातून शेतकरी आणि ग्राहकांना लाभ होणार असल्याचे अन्न प्रक्रिया मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले आहे.