प्रतिनिधी/ महाबळेश्वर
अतिवृष्टीमुळे जुलै महीन्यात वाहुन गेलेला चतुरबेट येथील कोयना नदीवरील पुल सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बांधावा अन्यथा येत्या पावसाळयात पुन्हा महाबळेश्वर तालुक्यातील पिश्चिम भागतील 47 गावांचा संपर्क तुटेल असा इशारा 105 गाव समाज अध्यक्ष घनश्याम सपकाळ यांनी दुधगाव येथील ग्रामस्थांच्या बैठकीत दिला या वेळी कोयना इज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किसन जाधव व सचिव डी के जाधव हे देखिल उपस्थित होते
जुलै महीन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे महाबळेश्वर तालुक्याच्या पिश्चिम भागातील रस्ते शेती आणि पुल यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले नदी आढया वरील अनेक पुल वाहुन गेले या मध्ये चतुरबेट गावच्या हद्द्तील कोयना नदीवरील पुलाचाही समावेश आहे या पुला पलिकडे चतुरबेट , दाभे , खरोशी , आवळण , वाळणे , रेणोशी , गाढवली , आहीर , रूळे व त्या पुढे उचाट वाघावळे रत्नागिरी जिल्हयाच्या सिमे पर्यंतची 47 गावे आहेत पावसाळया पुर्वी पुलाचे बांधकाम झाले नाही तर या गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटणार आहे अशा स्थितीत केवळ जल मार्गाने या गावांना पोहचता येणार आहे आणि हा प्रवास अत्यंत गैरसोईचा तसेच जिकीरीचा आहे या ठिकाणी नविन पुलाची मागणी करण्यासाठी 105 गाव समाज अध्यक्ष घनश्याम सपकाळ यांच्या अध्यक्षते खाली दुघगाव येथील ग्रामदेवीच्या मंदीरात एक बैठक पार पडली या बैठकीत सर्व ग्रामस्थांच्या वतीने सपकाळ यांनी ही मागणी केली या बैठकीला कोयना इज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किसनराव जाधव सचिव डी के जाधव व संचालक बी व्हि शेलार आदी मान्यवर उपस्थित होते
कोयना इज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किसनराव जाधव म्हणाले की महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्ते शेती व पुल यांचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने प्राधान्याने या भागातील रस्ते पुल दुरूस्तीसाठी निधी पुरवावा या भागातील लोकांची शेती ही पावसाच्या लहरीवर अवलंबुन आहे अतिवृष्टीमुळे अनेक गावातील शेती वाहुन गेली आहे ही शेती उभी करता करात नाकी नव येणार आहे अशा वेळी शासनाने निधी पुरवुन या भागातील लोकांना दिलास दयावा अशी मागणी किसनराव जाधव यांनी या बैठकीत बोलताना केली
तालुक्याच्या पश्चिम भागातील दळणवळणासाठी चतुरबेट पुल महत्वाचा आहे याच पुलावरून कोयना विभागातील लोक रोजगारासाठी याच पुलावरून शहरात जातात याच पुलावरून शाळेतील विदयार्थी शिरवली या गावी शिक्षणासाठी जातात त्याच प्रमाणे आठवडे बाजार असो अथवा दवाखाना असो याच पुलावरून जावे लागते जर हा पुल लवकर झाला नाही तर सध्या तात्पुर्त्या स्वरूपात नदीमध्ये भराव टाकुन तयार केलेला पुल पावसाळयात नदीच्या पाण्यात जाण्याचा धोका अधिक आहे म्हणुन पावसाळया पुर्वी या पुलाचे बांधकाम होणे आवश्यक आहे असे कोयना इज्युकेशन सोसायटीचे सचिव डी के जाधव यांनी दुधगाव येथील बैठकीत स्पष्ट केले