पंढरपुरातील कुटुंबांबाबत ‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल : तहसीलदार, आरोग्य यंत्रणा आंगणेवाडीत दाखल
प्रतिनिधी / मसुरे:
‘पंढरपूरची कुटुंबे अडकली आंगणेवाडीत’ हे वृत्त ‘तरुण भारत’मधून मंगळवारी प्रसिद्ध होताच महसूल प्रशासनाला खडबडून जाग आली. मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांसोबत मंगळवारी आंगणेवाडीत धाव घेतली. या 27 जणांची आस्थेने विचारपूस करून त्यात असणाऱया दोन गर्भवती महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी मालवण येथील स्त्राr रोगतज्ञ अच्युतराव सोमवंशी यांच्या दवाखान्यात दाखल केले. या दोन्ही महिलांची तपासणी केल्यानंतर महिला पूर्णपणे सुरक्षित असून प्रसुतीपर्यंतचा सर्व खर्चाचा भार आणि जबाबदारी डॉ. सोमवंशी यांनी घेतल्याची माहिती तहसीलदार पाटणे यांनी दिली. सायंकाळी उशिरा या दोन्ही महिलांना सर्व वैद्यकीय तपासण्या करून पुन्हा आंगणेवाडीत आणण्यात आले. या 27 जणांची योग्य खबरदारी महसूल प्रशासन घेईल आणि त्यांना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन पाटणे यांनी दिले.
आंगणेवाडी यात्रेसाठी आलेल्या आकाश पाळणा खेळणाऱया पंढरपूर येथील 27 जणांना लॉकडाऊनचा फटका बसल्याने आंगणेवाडीतच गेले अनेक दिवस अडकून पडावे लागले आहे. याबाबत तरुण भारतमधून आवाज उठविला असता, मंगळवारी महसूल आणि प्रशासनाची धांदल उडाली. यात दोन गर्भवती महिलांना त्रास होऊ नये, यासाठी तहसीलदारांनी विशेष खबरदारी घेतली असून दानशूर व्यक्तींमार्फत त्यांना अन्नधान्य मिळण्यासाठी प्रयत्न केले. या महिलांच्या मसुरे आरोग्य केंद्रात पुढील तपासण्या आणि औषधोपचार करण्यात येतील. तशा सूचना मसुरे आरोग्य अधिकाऱयांना पाटणे यांनी देऊन त्यांचे वैद्यकीय आणि अन्नधान्याचे हाल होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना आंगणेवाडी तलाठय़ांना दिल्या आहेत.
मसुरे जि. प. सदस्या सौ. सरोज परब यांनीही सर्वांना भेट देऊन योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत. दरम्यान, कोळंब येथील रहिवासी, माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल न्हिवेकर व श्रीकांत लाड या लोकांच्या मदतीसाठी धावून आले. न्हिवेकर यांनी 25 किलो तांदूळ, 5 किलो बटाटी, 5 किलो कांदे, 5 किलो तूरडाळ, 5 किलो साखर, चहा पावडर, गोडे तेल पिशव्या, मसाला, मीठ, नारळ, दूध पिशव्या, बिस्किटे आदी सुमारे 10 दिवस पुरेल इतके साहित्य या कुटुंबांकडे सुपुर्द केले. न्हिवेकर व लाड यांनी माणुसकी जोपासत केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, सेक्रेटरी मधुकर आंगणे, समाजसेवक बाळा आंगणे, उपसरपंच समीक्षा आंगणे, शशी आंगणे, समीर आंगणे, नंदू आंगणे, युवा समाजसेवक उत्कर्ष न्हिवेकर, विजय लाड, नाना लाड आदी उपस्थित होते.
भगिरथ प्रतिष्ठानकडूनही जीवनावश्यक वस्तू
भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांनी या लोकांना अन्नधान्य व मुलांना खाऊ देण्याचे निश्चित केले. यासाठी डॉ. देवधर यांनी त्यांना 10 दिवस पोटभर पुरेल इतके धान्य, खाऊ, बिस्किट, दूध आदी वस्तू मालवणचे नगरसेवक आप्पा लुडबे यांच्याकडे पाठवून दिले. लुडबे यांनी ते आंगणेवाडी येथे येऊन सुपूर्द केले.
बिळवस ग्रा.पं., आंगणेवाडी तलाठय़ांची मदत
बिळवस ग्रामपंचायतीने या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. आंगणेवाडी तलाठय़ांनीही 25 किलो तांदूळ आणि मोठी पिशवी भरून पिठ या 27 जणांना सूपुर्द केले. सरपंच सौ. रुपाली नाईक, ग्रामसेविका मनस्वी मधुकर कुणकवळेकर, उपसरपंच समीक्षा आंगणे आदी उपस्थित होत्या. आंगणेवाडीतील ग्रामस्थांनीही वस्तूरुपात या सर्वांना मदत केली.