पतीला घराला हवा होता वंशाचा दिवा, मुलासाठी मारहाण, आईविना तीन मुली पोरक्या
सालेली / उदय सावंत
गोमेकॉतून बालकाचे अपहरण केलेल्या सालेली – सत्तरी येथील विश्रांती गावस हिने सदर बालकाचे अपहरण करण्यामागची कारणे अनेक असली तरी घरामध्ये आपला वंश वाढविणारा मुलगा नसल्याने व दुसऱया बाजूने पतीकडून वारंवारपणे होणारी मारहाण यातून तिच्याकडून ही चूक घडल्याची शक्मयता वर्तविली जात आहे. बालक अपहरण प्रकरणामुळे पोलिसांनी विश्रांतीला अटक केली आहे मात्र यामुळे तिच्या तीन लहान मुली आई विना पोरक्मया झाल्या आहेत. त्यांचा सांभाळ सध्यातरी शेजाऱयाकडून होत असला तरी त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बालकाचे अपहरणामुळे सालेली गाव पुन्हा एकदा चर्चेत आला असून जवळपास पंधरा वर्षापूर्वी खडी पेशरप्रकरणामुळे हा गाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजला होता.
तीन मुलीच चौथी सुद्धा मुलगीच पतीचा पारा चढला.
आपण आता एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असलो ग्रामीण भागात मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक केला जातो. मुलगा असला की आपल्या वंशाचा दिवा तर मुलगी परक्याचे धन असा समज ग्रामीण भागांमध्ये आजही रुढ आहे. यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होताना आजही पहावयास मिळत आहे. तोच प्रकार विश्रांती गावस हिच्यासोबत घडल्याचे बोलले जात आहे. विश्रांतीने पहिल्या तीन मुलींना जन्म दिला. मात्र मुलगा न झाल्यामुळे पतीकडून वारंवारपणे मारहाण सहन करावी लागली. यामुळे असह्य मारहाणीला कंटाळूनच तिने बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केलाही असेल मात्र आज सदर कुटुंबियांवर मोठा आघात निर्माण झालेला आहे.
चौथी सुद्धा मुलगीच
दरम्यान मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विश्रांती एक महिन्यापूर्वी प्रसूत झाली होती मात्र मुलगी की मुलगा याची कानोकान खबर विश्रांतीने शेजाऱयांना दिलीच नाही. रविवार 13 जून रोजी बारसा निश्चित करण्यात आला होता. तशी पूर्वतयारीही करण्यात आली होती. मात्र बालकाच्या अपहरण प्रकरणात विश्रांती गावस गुरफटल्याने सदर कार्यक्रम होऊ शकला नाही. नागरिकांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ज्यावेळी तिने चौथ्या अपत्याला जन्म दिला त्यावेळी मोठय़ा प्रमाणात फटाके वाजवून स्वागत करण्यात आले होते. ग्रामीण भागांमध्ये आजही मुलगा जन्माला आला की फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. मात्र विश्रांतीला चौथी मुलगी झाली असताना सुद्धा त्याने फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्याचे कारणच काय असा सवाल आता निर्माण झालेला आहे. विश्रांतीने ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी तर फटाके वाजवले नसतील ना असा सवाल निर्माण झालेला आहे. तिला मुलगा झाला नव्हता तर मुलगी झाली होती अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
तर ती मुलगी आहे तरी कुठे ?
दरम्यान एका महिन्यापूर्वी विश्रांतीला मुलगी किंवा मुलगा झाला होता तर ते एक महिन्याच्या बाळ आहे तरी कुठे असा सवाल आता उपस्थित होऊ लागलेला आहे. मुलगा झाला असता तर तिने बालकाचे अपहरण करण्याचे कारणच काय? मुलगी झाली होती तर ती आहे कुठे? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एकूण हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे वाटत आहे. सध्या विश्रांती गावसला आगशी पोलिसांनी चौकशीसाठी अटक आहे. आज तिला न्यायालयामध्ये हजर केले असता पाच दिवसांसाठी चौकशी रिमांड देण्यात आलेला आहे. यामुळे पोलिसांकडून त्याची रितसर चौकशी होणार आहे.