प्रतिनिधी/ सातारा
सध्या एसटीच्या काही कर्मचाऱयांचा संप चालु असल्याने एस.टीच्या अनेक फेऱया रद्द झाल्या आहेत. त्यामुळे अनेक बसेस या आगारात एकाच जाग्यावर उभ्या आहेत. यातच या परिसरात कचऱयाचे आणि घाणीचे सांम्राज्य ही तितकेच पसरले होते. या बाबतची बातमी दै.तरूण भारतच्या वृत्तपत्रात प्रसिध्द केली होती. याचीच दखल घेत सध्या सातारा आगार चकाचक करण्यात आले आहेत.
येथील स्वच्छतेची जबाबदारी ही खासगी कॉन्ट्रक्टर कडे देण्यात आली आहे. त्यातच मागील दीड महिन्याहुन अधिक कालावधीपासुन एस.टीच्या कर्मचाऱयांनी संप पुकारल्यामुळे सुरूवातीला सर्वच फेऱया रद्द होत्या. त्यामुळे आगारात प्रवाश्यांची ये-जा नव्हती. पण आत्ता हळुहळु एस.टीच्या फेऱया पुर्वरत होत असल्याने प्रवाश्यांची संख्याही वाढत आहे. पण आगारात कचऱयाची वेळीच उचल होत नसल्याने सर्वत्र घाणीचे सांम्राज्य पसरले होते.
याचा सर्वाधिक नाहक त्रास हा येणाऱया प्रवाश्यांना होत होता. यासंबंधीचे लेखन केल्याने संबंधीत ठेकेदाराला जाग आल्याने संपुर्ण आगाराची स्वच्छता करण्यात आली आहे. अन् सध्या हे आगार चकाचक दिसु लागले आहे. ही स्वच्छता नियमीत अशाच प्रकारे करण्यात यावी, अशी आशा ग्राहकांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.