कार्यकारी अभियंते बसवराज हलगी यांची माहिती : करंबळ, हेब्बाळनजीक वळणदार ठिकाणी डांबरीकरणाचे काम सुरू
वार्ताहर /खानापूर
खानापूर बिडी-अळणावर या राज्यमार्गावर अनेक धोकादायक वळणे आहेत. या धोकादायक वळणाच्या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने वळणदार व अपघात प्रवण ठिकाणी प्लॅनिंग अँड रोड असेसमेंट सेंटर या योजनेअंतर्गत रस्त्याचा विकास हाती घेतला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अनेक ठिकाणची धोकादायक वळणे आता कमी होणार आहेत.
या राज्यमार्गावर असलेल्या अनेक ठिकाणी धोकादायक वळणे असल्याने रस्ता अपघातग्रस्त बनला आहे. त्यामुळे वळणदार ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने करंबळ गावाजवळ 500 मीटर रस्त्याचे काम हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे हेब्बाळपासून काही अंतरावरील वळणावर रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी 700 मीटर काम हाती घेण्यात आले आहे. सदर दोन ठिकाणे धोक्मयाची वळणे समजली जातात. हेब्बाळजवळील वळणावर नंदगडकडून येणारी वाहने सुसाट येत असल्याने अनेकवेळा अपघात घडले आहेत. पंधरवडय़ापूर्वी या ठिकाणी दुचाकीवरील दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. त्याची दखल घेऊन तातडीने या राज्यमार्गावरील ठिकाणी डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. खानापूर तालुक्मयातील अनेक राज्यमार्ग संदर्भात बोलताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते बसवराज हलगी म्हणाले, खानापूर तालुक्मयात सात राज्यमार्ग सुरू होतात. यापैकी जांबोटी, पिरनवाडीमार्गे बेळगावला जाणारा हा राज्यमार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्गीकृत करण्यात आला आहे.
याशिवाय खानापूर तालुक्मयात सुरुवात होणाऱया उर्वरित सहा रस्त्यांपैकी जांबोटी-जत या राज्यमार्गापैकी खानापूर शहरातून जाणाऱया पारिश्वाड रस्त्याचा 20 कोटींच्या निधीतून विकास पूर्ण झाला आहे, असे त्यांनी सांगितले
हेम्माडगा ते सिंधनूर रस्त्याच्या कामासाठी प्रस्ताव
हेम्माडगा ते सिंधनूर या रस्त्याच्या कामासाठीही सरकारकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. नागरगाळी-कटकोळ राज्यमार्ग नागरगाळी, हलशी, नंदगड व तेथून लालवाडीमार्गे चापगाव, पारिश्वाडला जोडला जातो. या 44 किलोमीटर रस्त्याच्या विकासासाठी जवळपास 50 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करून विकास साधण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. सध्या या रस्त्यापैकी हलशीपासून नागरगाळीपर्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 5 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे अभियंते बसवराज हलगी यांनी सांगितले.