पंतप्रधान मोदींची योजना, आणखी 146 जणांची सुटका, अमेरिका-तालिबान शब्दयुद्ध
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अफगाणिस्तान समस्येवर चर्चा करण्यग्नासाठी पंतप्रधान मोदी यांनी येत्या गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत केंद्रीय गृह विभागाकडून विरोधी पक्षनेत्यांना तेथील परिस्थिती आणि भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी योजलेले उपाय यांची माहिती देण्यात येणार आहे. बैठकीचे निमंत्रण संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून दिले जाणार आहे.
या बैठकीची घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटरवर केली. अफगाणिस्तानात तालिबान या संघटनेने देशाचा ताबा घेतला आहे. त्यानंतर निर्माण झालेली स्थिती, भारत आता त्यग्ना देशाशी कसे संबंध ठेवणार आहे, भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी कोणती योजना आखलेली आहे, इत्यादी मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होणे शक्य आहे. विरोधी पक्षांकडून काही सूचना केल्या जाण्याचीही शक्यता आहे. धोरणात एकवाक्यता निर्माण करण्यग्नाच्या हेतूने सरकारने हे पाऊल उचलले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आणखी 75 जणांची सुटका
अफगाणिस्तानातून आतापर्यंत एकंदर 730 भारतीयांना भारतात परत आणण्यग्नात आले आहे. हे सर्व नागरिक हिंदू आणि शीख समुदायांचे आहेत. सोमवारी एकंदर 146 जणांना भारतात आणण्यग्नात आले. नागरिकांना परत आणण्याचा कार्यक्रम आतापर्यंत पूर्वनिर्धारित योजनेनुसार पार पडला आहे. या नागरिकांना प्रथम दोहा येथे आणण्यग्नात आले. नंतर तेथून भारतात आणण्यात आले. तेथील परिस्थती अद्यग्नाप अस्थिर आहे, असे परतलेल्यांपैकी अनेकांनी स्पष्ट केले. आपली सुटका झाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. सोमवारी सुटका झालेल्यांपैकी 75 जण अफगाण हिंदू-शीख नागरिक असल्याचे सांगण्यात आले.
अवमानास्पद वागणूक
परतणाऱया भारतीय नागरिकांना तालिबानच्या हस्तकांनी काबूल विमानतळावर अवमानास्पद वागणूक दिल्याचे स्पष्ट होत आहे. या नागरिकांना पाच तासांहून अधिक काळ जमिनीवर बसवून ठेवण्यात आले. आपल्याला आता ठार मारण्यात येईल, अशी भीती यावेळी आपल्याला वाटत होती. त्यामुळे जीव मुठीत धरुन आपण विमानाची वाट पहात होतो, असे या नागरिकांनी सांगितले. मात्र, अखेरीस त्यांना घेऊन विमान निघाले आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. भारताबरोबरच ब्रिटन आणि फ्रान्सनेही आपल्या नागरिकांची सुटका केली.
धर्मग्रंथाच्या 3 प्रतीही आणल्या
सोमवारी भारतीय वायुदलाच्या विमानाने ज्या भारतीयांना आणण्यात आले त्यांच्यासह शीखांचा पवित्र धर्मग्रंथ ‘गुरू ग्रंथ साहिब’च्या 3 प्रतींनाही आणण्यात आले आहे. या तीन प्रती अफगाणिस्तानातील गुरुद्वारांमधील असून शीखांच्या श्रद्धेचा विषय आहेत. त्या भारतात सुरक्षित स्थळी ठेवण्यग्नात येणार आहेत.
अमेरिका-तालिबान शब्दयुद्ध
31 ऑगस्टनंतरही अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात राहील, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी केली आहे. मात्र, तालिबानने त्याला विरोध केला असून जर अमेरिकेने 31 ऑगस्टच्या आत सैन्य माघार पूर्ण केली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे पुन्हा संघर्ष पेटणार का, अशी शंका व्यक्त होत आहे. अमेरिकेचे सैन्य पूर्ण मागे गेल्यानंतर तालिबान काही महत्वाच्या घोषणा करेल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे या घोषणा कोणत्या असतील, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर दिलेली आश्वासने तालिबान पूर्ण करेल का, यासंबंधीही जगात उत्सुकता असून पुढील एक दोन महिन्यग्नात त्या देशाची नेमकी दिशा स्पष्ट होईल. तोपर्यंत वाट पहावी लागेल, असे तज्ञांनी प्रतिपादन केले.