नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अफगाणिस्तान समस्येवर चर्चा करण्यग्नासाठी केंद्र सरकारने आज गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. सकाळी 11 वाजता होणाऱया या बैठकीत अफगाणमधील सद्यस्थिती, तालिबानसंबंधीची भारताची भूमिका आणि भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी योजलेले उपाय यांची माहिती दिली जाणार आहे. तसेच विरोधी पक्षांकडून काही सूचना येण्याचीही शक्यता असून त्याचा विचारही सरकारकडून केला जाणार आहे. धोरणात एकवाक्यता निर्माण करण्यग्नाच्या हेतूने सरकारने हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या मुख्य नेतृत्त्वाखाली ही बैठक होणार आहे.
अफगाणिस्तानात तालिबान या संघटनेने देशाचा ताबा घेतला आहे. त्यानंतर निर्माण झालेली स्थिती, भारत आता त्यग्ना देशाशी कसे संबंध ठेवणार आहे, भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी कोणती योजना आखलेली आहे, इत्यादी मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होणार आहे. भारत सरकारचा तालिबानबाबत दृष्टीकोन बदलताना दिसत आहे. सरकारने तालिबानसोबत वार्ता करण्याचे संकेत दिले आहेत. देशहित लक्षात घेऊन भारत सरकार तालिबानसोबत वार्ता करण्याबाबत सध्या सकारात्मकता दर्शवल्याचे समजते. सध्या तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपले सरकार चालविण्याचे प्रयत्न तीव्र सुरु केले आहेत. त्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करून जबाबदारी सोपवली जात आहे.