स्वच्छता कामगारांना रिक्षात कोंबून नेण्यात येत असल्याचा प्रकार
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता करण्यासाठी येणाऱया स्वच्छता कामगारांना अडचणीचे बनले आहे. त्यांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी कंत्राटदाराने वाहनाची सोय केली आहे. पण बकरी कोंबल्याप्रमाणे रिक्षामधून स्वच्छता कामगारांना नेण्यात येत आहे. त्यामुळे माणसे आहेत की बकरी, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परिणामी राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. याचा फटका विविध अत्यावश्यक सेवा बजावणाऱया कामगारांना बसत आहे. विशेषतः खासगी क्षेत्रात काम करणारे नाकरवर्ग स्वतःचे वाहन घेऊन येत आहेत. पण शहराची स्वच्छता करण्यासाठी येणाऱया स्वच्छता कामगारांना कामावर ये-जा करण्यास अडचण होत आहे. त्यामुळे स्वच्छता कामावर येण्यास कामगार टाळाटाळ करीत असल्याने स्वच्छता कामावर परिणाम होत आहे. शहरातील कचऱयाची उचल करण्यास स्वच्छतेच्या कामासाठी स्वच्छता कामगारांना ने-आण करण्यासाठी कचरावाहू रिक्षाचा वापर केला जात आहे. विविध भागातील स्वच्छता कामगारांना रिक्षामधून आणून शहरात सोडण्यात येते. दुपारी काम झाल्यावर पुन्हा रिक्षामधून घरी सोडण्यात येते. पण रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कामगारांना रिक्षात बसवून आणण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. कोणतेच सामाजिक अंतर राखण्यात आले नसल्याने कामगारांना कोरोना होत नाही का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
मनपा अधिकाऱयांचे दुर्लक्ष
सामाजिक अंतर राखण्याची सूचना शासनाने केली आहे. सामाजिक अंतर राखले नसल्यास कोरोना नियमावलीअंतर्गत महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. पण महापालिकेचे कंत्राटदारच कोरोना नियमावलीची पायमल्ली करीत असून याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. वास्तविक पाहता घरोघरी जावून कचरा जमा करणाऱया कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिकेचे अधिकारी व कंत्राटदारांची आहे. पण नियमावली पायदळी तुडवून रिक्षामध्ये स्वच्छता कामगारांना खचाखच भरण्यात येत आहे.
वास्तविक पाहता स्वच्छता कामगारांना ने-आण करण्यासाठी मिनी बस करून ने-आण केल्यास सामाजिक अंतर पाळणे शक्मय आहे. पण याकडे दुर्लक्ष करून स्वच्छता कामगारांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन स्वच्छता कामगारांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.