वार्ताहार / अब्दुल लाट
अब्दुल लाट येथील मोकाट फिरणाऱ्या घोड्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी मोकाट घोड्यांच्या मालकांना बोलावून तसा समज देण्यात आला होता. तरीही प्रशासनाचा नियम धाब्यावर बसवून पुन्हा मोकाट घोडी गावात फिरू लागली लाट, लाटवाडी रस्त्यावर या मोकाट फिरणाऱ्या घोड्यांनमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले तरीदेखील मोकाट घोडे मालक ही मोकाट झाले. याचा प्रत्यय गुढीपाडव्यादिवशी सकाळी आला येथील शांताबाई कल्लाप्पा गुरव वय वर्षे 65 ज्येष्ठ महिला सकाळी देवदर्शनासाठी मंदिराकडे येत असताना अचानक दहा ते अकरा घोड्यांचा कळपाने वावरणाऱ्या एका घोड्याने त्यांच्यावर हल्ला चढविला त्यांना चावा घेतल्याने त्या जमिणीवर कोसळल्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रानोजी पुजारी नामक युवकावर देखील मोकाट घोड्यांनी हल्ला केला त्याचाही चावा घेतला लक्ष्मण पुजारी या व्यक्तीवर छातीवर लाथ मारल्याने त्याच्या बरकडी यांना गंभीर इजा पोहोचली आहे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे सदरची माहिती गावातील नागरिकांना कळताच गावात संतापाची लाट उसळली मोकाट घोड्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी अब्दुल लाट स्टॅंडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले घटनेची बाब लक्षात घेऊन कुरुंदवाड पोलीस स्टेशन त्वरित धाव घेतली घडलेली घटना चुकीचे असून मोकाट घोडे धारकांना शासन झालेच पाहिजे अशी मागणी होऊ लागली यावेळी कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे कुलकर्णी साहेब, नागरगोजे साहेब व त्यांचे सहकारी यांनी मोकाट घोडे धारकांना चौकशी करून सदर घोडे मालक यांचा शोध मोहीम दिवसभर चालू होता.तसेच जे घोडे मालक आपली घोडे सकाळी लगेच घरी नेले होते त्यांची घोडे पकडून आणून ग्रामपंचायत च्या आवारात बांधून ठेवण्यात आली आहेत.
आजची घडलेली घटना गावातील नागरिकांच्यासाठी गंभीर असून मोकाट घोडे धारकांना शासन होणे आता गरजेचे आहे. परिवर्तन विचार मंचाचे अध्यक्ष सागर सांगावे यांनी जखमी नागरिकांच्या उपचारासाठी मोकाट घोडे धारकांनी मदत करावी अन्यथा प्रशासनाने सदर घोडी विकून येणाऱ्या रकमेतून जखमी नागरिकांचा उपचार करावा अशी मागणी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद कुरणे, कल्लाप्पा कुमटोळे, पायगोंडा पाटील, संजय कोळी, पिंटू गुरव, आनंद गुरव, संजय परीट, प्रशांत आवळे, मारुती मोहिते, नरसु पुजारी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते घटना गंभीर घडली असताना देखील मोकाट घोडे धारकांची भाषाही मोकाटच होती अरेरावीची होती.
दोन वेळा ग्रामपंचायतीकडून घोडे धारकांवर कारवाई झाली होती. परंतु त्याचा घोडे धारकांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी ग्रामस्थां यांच्यातून होत होती.