(अध्याय पाचवा)
आतापर्यंत भक्त आणि भक्तिमहात्म्य याबद्दलची माहिती आपण घेतली. असेही काही महाभाग असतात की, ज्यांना भक्त आणि भक्ती याबद्दल काहीच मान्य नसल्याने ते भक्ती करत नाहीत म्हणून ते अभक्त म्हटले जातात, त्यांनी भगवंताकडे पाठ फिरवलेली असते, त्यांची गती काय होते असा प्रश्न जनक महाराज विचारत आहेत. जे भक्ती करत नाहीत त्यांना ईश्वर, ईश्वरी सत्ता याबाबत काहीच माहिती नसते. साहजिकच ते काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांनी लिप्त झाले असतात. ज्यांना आत्महित म्हणजे काय हे माहीत नसते अशांची गती काय होते?
राजाला ही माहिती देण्यासाठी आठवे योगी ‘चमस’ आनंदाने पुढे आले आणि म्हणाले, ‘आत्तापर्यंत आपण ईश्वर, त्यांचे अवतार, त्यांनी अवतार घेण्याची कारणे, त्यांनी अवतार कार्यात केलेल्या लीला, त्यांच्या भक्तांच्या प्रेमात पडून त्यांनी भक्तांना त्यांच्या हृदयात दिलेले स्थान तसेच त्यांच्या शत्रूंनी त्यांच्या दहशतीने का होईना त्यांच्या सततच्या केलेल्या स्मरणाने एक कर्तव्य म्हणून त्यांचाही केलेला उद्धार इत्यादी बाबी समजावून घेतल्या. असे सर्व जगाचे जनक आणि मुख्य गुरु, अशा भगवंताना जे भजत नाहीत त्यांची गती काय होत असेल त्याची कल्पनाच केलेली बरी! कारण असा अभक्त सर्वस्व गमावून बसतो. जे भगवंताना भजत नाहीत ते स्वतःला कर्ता समजत असतात आणि आपण करतो तेच बरोबर अशा तामसी प्रवृत्तीचे असतात. त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाचा अहंकार झालेला असतो. स्वतःच्या जीवनाची गाडी ते स्वतःच चालवण्याचा प्रयत्न करतात पण हे शक्मय नसल्याने आपसूकच खड्डय़ात जाऊन पडतात व त्यांचा अधःपात होतो. उसामध्ये काय गोडी आहे हे समजून न घेता शेळी नुसताच पाला चघळत असते त्याप्रमाणे हरिभक्तीची गोडी न जाणणारे अज्ञ जन विषयामध्ये गुंगून जातात. हे असे होऊ नये म्हणून भगवद्गीतेच्या पुस्तकावरील चित्रात भगवंत स्वतः अर्जुनाचा रथ चालवत आहेत असे दाखवले आहे, हे माणसाने कायम लक्षात ठेवावे व आपल्या जीवनाचे लगाम भगवंतांच्या हातात देऊन अर्जुनाप्रमाणे स्वस्थ बसावे. जे उच्च शिक्षित असतात ते गर्वाने हरिभजनाला विन्मुख होतात. त्यापेक्षा हरिभजन करणारा अशिक्षितदेखील श्रे÷ ठरतो. उच्चशिक्षित जे अभिमानाने घालवतो ते अशिक्षित दृढ श्रद्धेने साधूंच्या कृपा अनुग्रहाने मिळवतो. याउलट अभिमानी माणूस साधूंचा द्वेष करून काम व लोभ यांची वाढ करतो. त्यांची पूर्तता झाली नाही की त्याचा क्रोध अनावर होतो. एवढेच नाही तर आपण करतो तेच बरोबर असे म्हणून भोगवादाचे समर्थन करतो. पुराणातील कथा त्यांना पाहिजे तशा बदलून भोळय़ा भाबडय़ा लोकांना नादाला लावतो. माणसांनी स्वैराचार करू नये म्हणून वेदांनी बंधने घातली आहेत. पण वेळ आली तर, म्हणजे स्वार्थ साधण्यासाठी तीही धुडकावून लावायला हे लोक कमी करत नाहीत. थोडक्मयात अशा लोकांचे वर्णन करून आपली जीभ आपणच विटाळून घेण्यासारखे आहे. यांची पुढील गती अतिशय वाईट असून हे नरकाचे धनी होतात आणि अतिशय नीच योनीत हे फिरत राहतात.