प्रतिनिधी/ रत्नागिरी
विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्यात आल़े अभाविप राज्यभर विविध कुलगुरु, खासदार, आमदार यांना भेटून प्रश्न मांडत आह़े याचा पार्श्वभूमीवर धुळे येथे 26 ऑगस्ट रोजी अभाविप धुळे शाखेचे कार्येकर्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांनी भेट देण्यास नकार दिल़ा यावेळी पालकमंत्र्यांची गाडी अडवणाऱया विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार करत बुक्यांचा मारा केला होता. त्याचा शुक्रवारी निषेध करण्यात आला.
यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी अब्दुल सत्तार व उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा देत त्यांच्या छायाचित्राचे दहन केले. यावेळी दक्षिण रत्नागिरी संयोजक राहुल राजोरिया, ईशा फाटक, स्वरुप काणे यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होत़े
विद्यार्थ्यांतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आल़े कोरोना महामारीमुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत़ तरी देखील विद्यार्थ्यांकडून या सत्राचे परीक्षा शुल्क घेण्यात आले. ते विद्यार्थ्यांना परत देण्यात याव़े शैक्षणिक वर्ष सन 2020-21 या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात 20 टक्के कपात करण्यात यावी, तसेच सरासरीच्या चुकीच्या सुत्रामुळे लावण्यात आलेल्या निकालाचे पूर्नंमुल्यांकन करण्यात याव़े नवीन शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शैक्षणिक शुल्क जास्तीत जास्त 15 टक्के घेण्यात यावे व उर्वरीत शुल्क 4 टप्प्यात घेण्यात याव़े स्वायत्त विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठीत करण्यात यावी, यासारख्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या….