‘श्रीनिवास कल्याणं’ यासारख्या चित्रपटांमधील अभिनेत्री राशि खन्नाचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेत्री आता केवळ सौंदर्यापुरती मर्यादित राहिल्या नसल्याचे मानणे आहे. अद्याप ही पुरुषांचे वर्चस्व असलेली चित्रपटसृष्टी आहे. पण आगामी अनेक प्रकारच्या चित्रपटांमधून महिला कलाकार स्वतःचा मार्ग निर्माण करत असल्याचे मला वाटते असे तिने म्हटले आहे.
तेलगू चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान कायम राखायचे असल्यास तुम्हाला अनुष्का शेट्टी किंवा सामंथा अक्किनेनी यांच्याप्रमाणे उत्तम अभिनेत्री असावे लागेल. या अभिनेत्रींनी दक्षिणेत अभिनेत्रींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पूर्वी केवळ चांगले दिसणे आणि उत्तम गाणी सादर करणे पुरेसे होते. पण आता चांगली अभिनेत्री असणे गरजेचे आहे. दक्षिणेतही चांगल्या अभिनेत्री अनेक आहेत. याची सुरुवात झाली असून आम्हाला अद्याप बराच पल्ला गाठायचा असल्याचे राशि सांगते.
राशिने दक्षिणेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडच्या काही चित्रपटांमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. राशि लवकरच अजय देवगणसोबत दिसून येणार आहे.