लॉकडाऊनमुळे देशातील सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्याला कलाकार देखील अपवाद नाहीत. झी युवावरील साजणा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली आणि आता एका नव्या भूमिकेत ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मध्ये येणारी गुणी आणि प्रेक्षकांची लाड़की अभिनेत्री पूजा बिरारी देखील एका अडचणीत आहे.
कोरोना काळात तिच्यावर आलेल्या संकटा बद्दल बोलताना पूजा म्हणाली, या लॉकडाऊनमध्ये देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि त्यामुळेच आपल्या सध्याच्या सरकारने सर्व गोष्टींची काळजी घेत न्यू नॉर्मल लाईफचे आवाहन केले. आपली मनोरंजनसफष्टीसुद्धा हळूहळू का होईना सुरु झाली. पण काही प्रॉब्लेम्स हे मालिकांच्या बिहाइंड सीन सारखे आहेत आणि सध्या कलाकार म्हणून माझ्या बाबतीत ते घडत आहेत आणि म्हणूनच मला ते माझ्या लाडक्या प्रेक्षकांसमोर आणायचे आहेत. सध्या कोरोनाच्या या संकटात कलाकार म्हणून तुम्हाला मुंबईमध्ये काम मिळेल मात्र राहायला भाडय़ाचे घर मिळणं दुर्लभ झालंय. झी युवा या वाहिनीने ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत मला पुन्हा संधी दिली. या लॉकडाऊनमध्ये एक चांगले काम मिळणं हे प्रत्येक कलाकारासाठी खूप महत्वाचे आहे जे मला मिळालं मात्र ते जर तसंच ठेवायचं असेल तर मला मुंबईमध्ये राहायला भाडय़ाने घर हवंय मात्र ते काही सध्या मिळताना दिसत नाही आहे आणि मला आता खरंच घर शोधण्याचा आणि सतत नकार मिळण्याचा त्रास आणि कंटाळा आलाय. झी युवा वाहिनीने सेट वर जागा अरेंज करण्याचा प्रयत्न केला पण ऑलरेडी आप्पा आणि काही इतर लोक शूटिंग सुरु झाल्यापासून राहत असल्यामुळे रूम्स नाही आहेत त्यामुळे ते शक्य झाले नाही. सध्या मी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचे माझे सहकलाकार, सोहम निर्मिती संस्था आणि झी युवा वाहिनी सगळेच माझ्यासाठी घर शोधत आहेत. मात्र सध्या कोणत्याच सोसायटीमध्ये नवीन व्यक्तीला प्रवेश नाही. मी आणि माझ्या सारखे अनेक कलाकार बाहेरच्या शहरातून मुंबईमध्ये कामाल्लनिमित्त येतात. या लॉकडाऊनमध्ये न्यू नॉर्मलचे पालन करत स्वत:ची आणि इतरांची काळजी घेत आम्हाला काम करायचे आहे. पण काही निवडक सोसायटी सेक्रेटरी आम्हाला लॉकडाऊनच्या नावावर जागा द्यायला नकार देत आहेत. सध्या सगळं हळूहळू सुरु झालंय पण अजूनही न्यू नॉर्मलचे रूल्स मानले जात नाही आहेत. स्वत:ची काळजी घेऊन जर काम नाही सुरु करू शकलो तर कसं होणार? मला अजूनही घर मिळत नाही आहे. कलाकरांना होणाऱया या त्रासाबद्दल कोणी काही मार्गदर्शन करू शकेल का? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.