वृत्तसंस्था/ ढाका
रविवारी येथे झालेल्या बांगलादेश आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू अभिषेक सैनीने पुरूष एकेरीचे जेतेपद पटकाविताना आपल्याच देशाच्या रुत्विक संजीवीचा अंतिम सामन्यात पराभव केला.
अंतिम फेरीतील सामन्यात अभिषेक सैनीने संजीवीचा 34 मिनिटाच्या कालावधीत 21-15, 21-18 असा पराभव करत एकेरीचे जेतेपद पटकाविले. या स्पर्धेत सैनीने उपांत्य सामन्यात भारताच्या कार्तिकीय गुलशनकुमारचा 17-21, 21-15, 21-15 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. महिलांच्या दुहेरीचे जेतेपद भारताच्या मेहरीन रिझा आणि आरती सुनील यांनी पटकाविताना मलेशियाच्या कस्तुरी राधाकृष्णन व विनोशा राधाकृष्णन यांचा 22-20, 21-12 असा पराभव केला.