नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबमध्ये पुढील विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, असे स्पष्टीकरण पंजाबमधील काँग्रेसचे प्रभारी हरिश रावत यांनी दिले आहे. त्यांच्या या स्पष्टोक्तीमुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलण्याची मागणी करणाऱयांचा हिरमोड झाला आहे. पंजाबमध्ये सरकारला कोणताही धोका नाही, परंतु राज्य आणि जिल्हास्तरावर सरकारच्या कामकाजाबाबत काही चिंता असल्याचे बंडखोर मंत्री आणि आमदारांसोबत झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर रावत यांनी सांगितले.
पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू असा ‘सामना’ रंगला होता. गेल्या महिन्यातच हायकमांडच्या निर्देशानुसार त्यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला होता. तथापि, अजूनही द्वयींमध्ये पूर्णतः एकमत न झाल्याने वाद धुमसताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष प्रभारी हरिश रावत यांनी बुधवारी रावत यांनी काही आमदार आणि अन्य वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत केली. याचदरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांना सल्लागारांच्या पक्षविरोधी आणि देशविरोधी वक्तव्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे.
पंजाबचे काही मंत्री आणि आमदारांनी बुधवारी रावत यांची भेट घेत पुढील वषी राज्यात होणाऱया विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाच्या शक्मयतांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याशिवाय त्यांनी पक्षाच्या एकतेसाठी हायकमांडवर विश्वासही व्यक्त केला आहे.