ऑनलाईन टीम / गुवाहाटी :
गेले कित्येक वर्ष सुरू असलेला बोडोलँड वाद संपुष्टात आणण्यास केंद्रातील मोदी सरकारला यश आले आहे. गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत सोमवारी बोडोलँड शांतता करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या. या करारामुळे गेल्या 50 वर्षांपासून सुरू असलेला बोडोलँड वाद संपुष्टात आला आहे.
अमित शहा म्हणाले, गुरुवारी 30 जानेवारीला 1 हजार 535 कॅडर शस्त्रांसमवेत आत्महसमपर्ण करतील. बोडोलँड वादामुळे आतापर्यंत 2 हजार 823 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, बोडोलँड वाद संपवण्यासाठी मोदी सरकार गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत होते. या करारामुळे आसाममधील नागरिकांचा विकास होण्यास मदत होईल आणि आसामवासीयांना भयमुक्त जीवन जगता येईल, असा विश्वास अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला.