नवी दिल्ली/प्रतिनिधी
राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) २८ व्या वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी देशाच्या देशाच्या मानवाधिकार संस्थेचे प्रमुख अरुण मिश्रा यांनी बोलताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नवीन युग आणले, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी संबोधित केलेल्या कार्यक्रमात न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी हे विधान केलं. यावेळी ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणाच्या तरी सांगण्यावरून भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करणं हे आदर्शवादाचं प्रतीक झालंय, अशी टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) २८ व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलताना न्यायमूर्ती मिश्रा म्हणाले, “मिस्टर शहा केवळ तुमच्यामुळे जम्मू -काश्मीरमध्ये आता एक नवीन युग सुरू झाले आहे. जम्मू -काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याबद्दल आणि राज्यंना दोन केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिल्याबद्दल मिश्रा यांनी गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात हिंसक घटना घडल्या, की त्यावरून मानवाधिकारांचा मुद्दा चर्चेत येतो आणि आरोप-प्रत्यारोप केले जातात. अशा घटनांवर मानवाधिकार आयोग देखील भूमिका घेत असतो. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८व्या स्थापना दिवस कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधनपर भाषण केलं. च्या सुरुवातीला बोलताना न्यायमूर्ती मिश्रा म्हणाले, “मिस्टर शाह केवळ तुमच्यामुळे जम्मू -काश्मीरमध्ये आता एक नवीन युग सुरू झाले आहे. जम्मू -काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याबद्दल आणि राज्यंना दोन केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिल्याबद्दल मिश्रा यांनी गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं.