ठेवीदारांची निराशा टाळण्यासाठी मुदतवाढ
प्रतिनिधी /बेळगाव
अल्पावधीत अतिशय लोकप्रिय ठरलेल्या तरुण भारत सौहार्द सहकारी नियमितच्या अमृतधन (मुदतठेव) व धनसागर (रिकरिंग) या दोन्ही ठेव योजनांना मिळत असलेला भरघोस प्रतिसाद पाहून ठेवीदारांची निराशा टाळण्यासाठी या दोन्ही योजनांना एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता या योजना 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत.
गुंतवणूकदारांसाठी ही एक आनंद वार्ता असून या वाढीव मुदतीचा त्यांनी लाभ घ्यावा. ठेवीदारांना आता 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. अमृतधन योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 27 महिन्यात सव्वालाख रुपयांचा परतावा मिळणार आहे. यासाठी या योजनेत किमान गुंतवणूक 10 हजार व त्या पटीत करता येईल.
धनसागर रिकरिंग ठेव योजनेंतर्गत दर महिन्याला किमान 600 रुपये पाच वर्षे तीन महिने भरल्यास 50 हजार परतावा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित, नार्वेकर गल्ली, बेळगाव, फोन- 0831-2424777 किंवा मो. क्र. 9108540877 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.