बेळगाव तालुक्मयातील सहा गावांची निवड, विकास कामांना देण्यात येणार चालना : गावांचा होणार कायापालट, 25 लाख निधी
दीपक बुवा /बेळगाव
केंद्र सरकार सध्या ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टिने अनेक उपाययोजना राबविताना दिसत आहे. ग्रामविकास साधला तरच देशाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृतग्राम योजना राबविण्यासाठी पाऊल उचलले आहे. यामुळे सर्वत्रच ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत बेळगाव तालुक्मयातील सहा ग्राम पंचायतींची नावे राज्य सरकारकडे पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे आता अमृतग्रामसाठी विविध योजना राबवून विकास करण्यात येणार आहे. यासाठी 25 लाखांचा निधी देण्यात येणार आहे.
बेळगाव तालुक्मयातील तीन आमदारांच्या कार्यक्षेत्रातील दोन गावांची निवड करण्यात आली आहे. यमकनमर्डी, बेळगाव ग्रामीण, दक्षिण मतदार संघातील हिरेबागेवाडी, हलगा, उचगाव, धर्नट्टी, न्यु वंटमुरी, येळ्ळूर गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता तातडीने या गावांतील विविध समस्यांना चालना देण्यात येणार आहे. संबंधित गावांचा शहरांच्या धर्तीवर विकास होणार आहे. बेळगाव जिल्ह्य़ासह राज्यातील सर्वच जिल्ह्य़ांचा यात समावेश असून यामध्ये राज्य सरकारकडून अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.
या गावांच्या विकासाचा आराखडा तालुका पंचायतमधील अधिकाऱयांना तयार करण्याची माहिती दिली आहे. सदर अहवाल तालुका पंचायतमधून राज्य पातळीवरील अधिकाऱयांकडे सोपविण्यात आला आहे. या योजनेंतर्गत शाळा, अंगणवाडी यांच्या परिसरात पाणी, कंपाऊंड आणि मैदान उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिक्षणावरही अधिक महत्त्व देण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक गावात पथदीप बसविण्यात येणार आहे. याचबरोबर प्रत्येक गावाला घरपती पाणी मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या गावांची निवड झाली आहे त्यांचा आराखडा तयार करण्यासाठी नुकतीच पिडीओंची बैठक घेण्यात आली.
तालुका पंचायतमध्ये ही बैठक घेऊन वरील सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान या गावापासून दुसऱया गावांना जोडणाऱया संपर्क रस्त्यांचांही विकास साधला जाणार आहे. ओला आणि सुका कचरा उचलण्यासाठी वाहनांची उपलब्धता करून प्रत्येक घरात डस्टबीन देण्यात येणार आहेत. त्यामुळे कचरा विघटनाला सोयीचे ठरणार आहे. याचबरोबर स्वच्छतागृहाचे पाणी रस्त्यावर अथवा गटारीत न सोडता ते जमिनीत पाणी झिरपण्यासाठीही या योजनेंतर्गत प्रयत्न केले जाणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक ग्राम पंचायतीवर सोलार पॅनल बसविण्यात येणार असून त्याचा उपयोग ग्राम पंचायतीला होणार आहे. हे सोलार पॅनल 4 केजीचे असणार असून जर ग्राम पंचायतीला सौरउर्जा पुरे होत असली तरी उर्वरीत वीज हेस्कॉमला देण्यात येणार आहे. यामुळे याचा फायदा ग्राम पंचायतीला होणार आहे. डिजिटल ग्रंथालयावर भर देण्यात येणार आहे. यासह इतर योजनांतर्गत यामध्ये विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत गावचा विकास साधण्याचे उद्दिष्ट संबंधित गावांना देण्यात येणार आहे. या योजनेसाठी पेंद्र व राज्य सरकारच्या योजना एकत्रित पद्धतीने राबविणार आहेत. याचबरोबर गावातील पिंपळ कट्टा, तलावांची खोदाई व त्याचे सौंदर्यीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून ही योजना यशस्वी करण्यासाठी उद्योग खात्री आणि 15 व्या वित्त आयोगातून हा विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यानंतर सरकारकडून 25 लाखांचा निधी देण्याची तरतूद होणार आहे.
ग्रामीण विकास साधण्यावर भर
ही योजना ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकारने राबविली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी, तलाव, ग्रंथालये, ग्राम पंचायत आदींसाठी फायदेशीर आहे. यामुळे ही योजना फलदायी आणि लाभदायी ठरणार आहे. यासाठी ग्राम पंचायतीबराब्रच नागरिकांनी याचा योग्यरित्या उपयोग करून घ्यावा, असे तालुका पंचायतच्या कार्यकारी अधिकाऱयांनी सांगितले.
– ता.पं.कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर