ऑनलाईन टीम / अमृतसर :
पंजाबमधील अनेक जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या अनेक समस्या समोर येत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा सुरळीत किंवा पुरेशा प्रमाणात नाही आहे. या संदर्भात शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना वीज पुरवठा सुरळीत केला जावा अशी विनंती देखील करण्यात आली होती. मात्र अजूनही वीज पुरवठा उपलब्ध नाही. लवकरात लवकर वीज पुरवठा पूर्ण काळासाठी उपलब्ध व्हावा अशी मागणी करत शेतकरी मजदुर संघटनेने अमृतसरमध्ये मंगळवारी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर घेऊन आंदोलन केले आहे.
- केवळ 5 ते 6 तासच वीज पुरवठा उपलब्ध
याबाबत माहिती देताना किसान मजदुर संघर्ष समितीच्या सचिवांनी सांगितले की, आम्हाला 10 जून रोजी 8 तास वीज पुरवठा केला जाईल असे वचन देण्यात आले होते. मात्र अजूनही आम्हाला केवळ पाच ते सहा तसाच वीज पुरवठा उपलब्ध होत आहे. याचा परिणाम आमच्या पिकांवर होत आहे. सरकार आपले वचन का पूर्ण करत नाही? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
- 3 दिवसात 28,453 तक्रारी
अमृतसर जिल्ह्यातील नोडल तक्रार केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर शहर आणि उपनगरातून मागील तीन दिवसात वीज पुरवठा खंडित झाला असल्याचा 28,453 तक्रारी आल्या होत्या. यातील 8 हजार तक्रारी या मागील काही दिवसांपासून पेंडींग आहेत. विद्युत अधिकाऱ्यांच्या मते, वादळ आणि पावसामुळे जिल्ह्यातील वीज सुविधेमध्ये नुकसान झाले आहे.
वादळामुळे पडलेली झाडे, तुटलेले खांब यामुळे हजारो घरांमध्ये 20-20 तास वीज पुरवठा बंद होता. ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत. तर काही ठिकाणी बंद पडले आहेत,