ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये मैत्रीचा धागा वर्षानुवर्षे अधिक गुंफला जात असुन यात आणखी एका नव्या पर्वाचा समावेश होणार आहे. याच पार्श्वभुमिवर आज दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी एक मोठा करार झाला असुन या कराराच्या निमीत्ताने दोन्ही देशांच्या दरम्यान जवळपास 6 लाख एके 203 रायफलच्या निर्मितीसंदर्भातील करार झाला आहे.
या कराराअंतर्गत भारतामध्ये जवळपास सहा लाख एके 203 रायफल्सची निर्मिती करण्यात येणार आहे. या करारावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोयगू यांनी स्वाक्षरी केली आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटलंय की, अलिकडच्या वर्षांमधअये भारत आणि रशिया दरम्यानचा संरक्षण करार अभूतपूर्व गतीने पुढे सरकत आहे. यापुर्वी ही माजी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राजनाथ सिंह यांनी आपले रशियन समकक्ष असलेल्या सर्गेई लावरोव तसेच सर्गेई शोयगू यांच्यासोबत 2+2 करार केला होता.