कोविशिल्ड’ प्रकरणात अमेरिकेचे नाक दाबणारी कंपनी म्हणूनही प्रकाशझोतात
प्रवीण जाधव / रत्नागिरी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमेरिकेकडून फायझर व मॉर्डना या दोन महत्वपूर्ण लसी तयार करण्यात आल्या आहेत़ मात्र या लसी बनवण्यासाठी लागणारे महत्वाचे घटक रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसीमध्ये तयार होत आहेत़ रत्नागिरीतील व्हिएव्हि लाईफ सायन्स या कंपनीकडून या घटकांची निर्मिती करण्यात येत आह़े कच्चा माल पुरविण्यावरून भारत-अमेरिकेमध्ये झालेल्या संघर्षात याच कंपनीच्या मुद्दयावर अमेरकेला माघार घ्यावी लागल्याच्या चर्चेने ही कंपनी विशेष प्रकाशझोतात आली आहे.
मुंबईस्थित व्हिएव्हि लाईफ सायन्स ऍण्ड लिपीड ही कंपनी गेल्या अनेक वर्षापासून औषध निर्मितीचे काम करत़े या कंपनीची रत्नागिरीमधील मिरजोळे एमआयडीसी कंपनीमध्ये शाखा आह़े या ठिकाणीच अमेरिकेच्या मॉर्डना व फायझर कंपन्यांसाठी लागणाऱया महत्वाच्या घटकांची निर्मिती करण्यात केली जात आह़े येथे आरएनए बेस हायली प्युरिफाईड सिन्थेटिक फॉस्पोलिपीड नॅनोपार्टीकल रत्नागिरीत तयार करण्यात येत आहेत. भारताला कोविशिल्ड लसनिर्मितीसाठी कचाचा माल पुरविण्यास अमेरिकेने नकार दिल्यानंतर उच्च पातळीवर झालेल्या चर्चेत अमेरिकेचे नाक दाबल्याची चर्चा रंगली होती. हे नाक दाबण्यासाठी रत्नागिरीतील व्हिएव्हि लाईफ सायन्स याच कंपनीत होणारे उत्पादन कळीचा मुद्दा ठरल्याचे सांगितले जात आहे.
भारताची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने कोव्हीशिल्ड लसीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्यास नकार दिल़ा यावर उलट-सुलट चर्चा सुरु असतानाच वरिष्ट स्तरावर चर्चाही सुरुच होत्या. भारताने राजकीय मुत्सद्देगीरी दाखवत अमेरिकेला ‘धोबिपछाड’ दिल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र यासाठी रत्ननगरीतील एक कंपनी अत्यंत मोलाची ठरल्याचे आता पुढे येऊ लागले आहे. अमेरिकेमध्ये तयार होणाऱया लसींसाठी आवश्यक कच्च्या मालामध्ये लिपिड नॅनोपार्टिकल्स हा महत्त्वपूर्ण घटक व्हिएव्हि लाईफ सायन्स या रत्नागिरीस्थित कंपनीतून निर्यात होतो. अमेरिकेतील लसींसाठी आवश्यक घटकाचा पुरवठा भारतातूनच होत असल्याची व तो थांबल्यास होणाऱया परिणामांची जाणीव अमेरिकेला झाल़ी यानंतर कोव्हिशिल्डच्या कच्च्या मालावरील बंदी उठवणे अमेरिकेला भाग पडल़े या आंतरराष्ट्रीय कुटनितीमध्ये रत्नागिरीतील या कंपनीचे योगदान असल्याचे सांगितले जात आह़े
40 हून अधिक उच्चशिक्षित कर्मचाऱयांचा निर्मितीसाठी राबता
रत्नागिरीत गेल्या 6 वर्षापासून ही कंपनी काम करत असून सुमारे 2 एकर जागेत या कंपनीचा पसारा आह़े सद्यस्थितीत 40 हून अधिक उच्च शिक्षित कर्मचारी या ठिकाणी काम करतात़ सुरक्षेच्या दृष्टेन अतिशय काळजी या कंपनीकडून घेतली जात़े कंपनीमध्ये तयार होणारा माल सुरक्षेमध्ये मुंबई येथे निर्यातीसाठी पाठवण्यात येतो, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आल़ी