ऑनलाईन टीम / अयोध्या :
भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसणारे तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर उपोषण सोडले.
महंत दास 12 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसले होते. त्यानंतर आठ दिवसात प्रकृती खालावली. दरम्यान, पोलिसांनी त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले. त्यांचे वजन नऊ किलोंनी कमी झाले आहे. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे.
महंत दास यांच्या शिष्य अर्चना यांनी असा आरोप केला की, स्वामीजी भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची मागणी करत होते. देशातील अल्पसंख्याकांकडून बहुसंख्य लोकांकडून सातत्याने होणारे हल्ले लक्षात घेता भारताला आता हिंदू राष्ट्र घोषित करणे अत्यावश्यक आहे, पण जिल्हा प्रशासनाने त्यांना जबरदस्तीने उपोषणस्थळावरून बळजबरीने उचलून नेले, पण त्यांच्या मागण्यांचा अद्याप विचार करण्यात आलेला नाही.