प्रतिनिधी/ वास्को
अयोध्येतील श्रीराम मंदिर साऱया भारतीयांना एकत्र आणून भारतीयांची एकात्मता आणखी सशक्त करणार आहे. श्रीराम मंदिराबाबत गैरसमजापासून आपण दूर राहायला हवे. श्रीराम मंदिर म्हणजे भारतीयांच्या एकतेचे प्रतिक आहे असे प्रतिपादन पंचायतराज्यमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.
दाबोळीचे आमदार व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी 2 लाख रूपयांचे समर्पण केले. या प्रसंगी मंत्री माविन गुदिन्हो यांनी राम मंदिराबाबत आपली भावना व्यक्त केली. यावेळी माजीमंत्री राजेंद्र आर्लेकर, दाबोळी भाजपा मंडळाचे अध्यक्ष संदीप सूद व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेच्या मुरगाव तालुका मंदिर समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर नायक यांच्याकडे समर्पण निधीचा धनादेश सुपुर्द केल्यानंतर मंत्री गुदिन्हो म्हणाले की, श्रीराम मंदिर ही भारतीयांची ओळख आहे. मंदिरासाठी होणाऱया समर्पणातून ही ओळख अधिक सद्ढ होणार आहे. या कार्याशी आम्ही भावनीक दृष्टी जोडले जाणार आहोत.