प्रतिनिधी/ बेळगाव :
शहर व परिसरात नियमाचे उल्लंघन करणाऱया वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या आठवडय़ाभरापासून बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर अरगन तलावानजीक रहदारी पोलीसांनी नियमबाहय़ वाहने चालणाऱया वाहनधारकांवर चौकशी करून दंडात्मक कारवाईचे सत्र केले आहे.
शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने अपघाताच्या प्रमाणातही वाढ होत आहे. वाहनधाकांनी सुरक्षितेसाठी डोक्मयावर हेल्मेट वापरावे, वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीसांची कारवाई सुरू आहे. शहरात हेल्मेट सक्ती बंधनकारक असून देखील वाहनधारक नियम धाब्यावर बसून विणाहेल्मेट वाहने चालवताना दिसत आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकांवर तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
बेळगाव-वेंर्गुला मार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपघातही वाढत आहेत. वाहनधारक कागदपत्राविणा वाहने बेधडक चालवताना दिसत आहे. वाहनचालक संबंधित कागदपत्रे स्वतःजवळ न ठेवता व नियमाचे उल्लंघन वाहने चालवताना दिसत आहेत. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने वाहनांची आडवणूक करून चौकशी केली जात आहे. काही चारचाकी वाहनचालक सिट बेल्ट न वापरताच बेफान वाहने चालवतात अशांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहनधारकांकडे आरसी बुक, ड्रायव्हिंग लायसन्स (परवाना), इन्सुरन्स पावती, धूर पावती आदी कागदपत्राची पाहणी पोलीस करताना दिसत आहेत. सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीकोनातून हेल्मेट वापरणे, नियमांचे पालन करणे, वाहनांशी संबंधित कागदपत्रे स्वतःजवळ ठेवणे गरजेचे आहे.