पत्रकार परिषदेत सीआयटूची मागणी
बेळगाव : अझमनगर येथील तरुण अरबाज मुल्ला याचा खून खानापूर येथील काही तरुणांनी केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेंव्हा अटक केलेल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सीआयटूच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
प्रेमप्रकरणातून हा खून झाला आहे. प्रेम करणे हा काही गुन्हा नाही. मात्र अशाप्रकारे या घटना घडणे ही मोठी धोक्मयाची घंटा आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत. यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलावे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. सुपारी देऊन हा खून झाला आहे. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कठोरात कठोर गुन्हे घालावेत आणि त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, मंदा नेवगी, राजेश्वरी कोलकार, गौरम्मा सुमित, शारदा गोपाल यांच्यासह कार्यकर्त्या उपस्थित होत्या.