ऑनलाईन टीम / पुणे :
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने आंधप्रदेशच्या किनारपट्टीला धडक दिली. त्यानंतर हे वादळ ताशी 14 किमी वेगाने पश्चिमेकडे सरकत असून, त्याची तीव्रता येत्या काही तासात कमी होणार आहे. हे क्षेत्र पुढे गुजरातच्या दिशेने सरकणार असून, 30 सप्टेंबरपर्यंत ते उत्तरपूर्व अरबी समुद्र तसेच लगतच्या गुजरात किनारपट्टीदरम्यान समुद्रात उतरणार आहे. समुद्रात उतरल्यानंतर याची तीव्रता पुन्हा वाढून त्याचे वादळात रुपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तवली आहे.