पाणी पातळीत वाढ झाल्याने धोका वाढला : लघु पाटबंधारे खात्याने लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर येथील अरवाळी धरणाला मागील काही वर्षांपासून गळती लागली आहे. परंतु यावषी या गळतीमध्ये वाढ झाल्याने सतत पाणी बाहेर पडत आहे. ही गळती वेळीच रोखणे गरजेचे आहे. एकीकडे धरणातील पाणी साठय़ात यावषी वाढ झाली असताना दुसरीकडे गळती अशीच राहिल्यास भिंत कमकुवत होवून धोका वाढण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने ही गळती काढणे गरजेचे आहे.
1965 मध्ये येळ्ळूर-अवचारहट्टी रोड शेजारी लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने अरवाळी धरण बांधण्यात आले. एकूण 282 हेक्टर या धरणाचा संपूर्ण परिसर आहे. 14.76 दशलक्ष घनफूट इतकी पाणी साठविण्याची धरणाची क्षमता आहे. दोन कॅनॉलच्या माध्यमातून परिसरातील 8.29 हेक्टर जमीन ओलिताखाली येते. यामुळे शेतीला वर्षभर पाणीपुरवठा करणे सोयीचे होत आहे. चार वर्षांपूर्वी या धरणाची पाटबंधारे विभागाकडून खोदाई करून पाण्याची क्षमता वाढविण्यात आली होती. तसेच कॅनॉलचे काँक्रिटीकरण देखील करण्यात आले होते.
गळतीमुळे रस्ता देखील खराब
मागील सात ते आठ वर्षांपासून या धरणाला गळती लागली आहे. यापूर्वी केवळ एकाच बाजुला गळती होती. परंतु आता दुसऱया बाजुलाही गळती सुरू झाली आहे. पावसाळय़ात पूर्ण क्षमतेने धरण भरल्यानंतर ही गळती सुरू होत असून जोवर पाणी साठा कमी होत नाही. तोवर गळती सुरूच असते. गळती लागलेले पाणी धरणाच्या खालील बाजूस असणाऱया रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे वारंवार हा रस्ता देखील खराब होत आहे. यावषी एप्रिल महिन्यापासून धरणातील गाळ तसेच आजुबाजुची माती काढण्याचे काम करण्यात आले. यामुळे पाण्याची क्षमता वाढली आहे. एकीकडे धरणाच्या पाणी साठय़ाची क्षमता वाढविली जात असताना दुसरीकडे मात्र गळतीत वाढ झाल्याने धोका देखील वाढला आहे. वेळीच ही गळती न रोखल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
ठिकठिकाणी कॅनॉलही फोडले
शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन कॅनॉलमधून पाणी पुरविले जाते. हे दोन्ही कॅनॉल परिसरातील शेतीला पाणी देतात. परंतु काही शेतकऱयांनी शेतीला पाणी देण्यासाठी कॅनॉलच फोडल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात असून, पुढील शेतकऱयांना पाणी मिळण्यास कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांनीही विद्युत मोटरद्वारे पाणी घेणे आवश्यक बनले आहे.
झाडांच्या मुळांमुळे गळती लागली का?
काही वर्षांपूर्वी धरणाच्या संरक्षक भिंतीला लागून झाडे लावण्यात आली होती. ज्या ठिकाणी झाडांची संख्या जास्त आहे त्या परिसरातून दोन्ही ठिकाणी गळती लागली आहे. झाडांच्या मुळांमुळे ही गळती लागली असल्याची शक्मयता शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयांनी या समस्येची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.