ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे. दिल्ली निवडणूकीत शाहीन बागला फोकस करत राजकारण होतना दिसत आहे. भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी पुन्हा एकदा शाहीन बाग आंदोलकांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष करत केजरीवाल यांची तुलना दहशतवादी आणि नक्षलवाद्यांशी केली आहे.
ते म्हणाले, दहशतवादी आणि नक्षलवादी ज्या प्रमाणं देशाचं नुकसान करतात. रस्त्यांची नासधूस करतात. सरकारी मालमत्तेचं नुकसान करतात, तेच काम मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहेत.