ईटानगर
बिहारची राजधानी पाटण्यात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी होती. मागील महिन्यातही बिहारमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. परंतु कुठल्याही प्रकारची जीवित-आर्थिक हानी झाली नव्हती. तर अरुणाचल प्रदेशात मंगळवारी सकाळी 8.21 वाजता 4.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाचे केंद्र अरुणाचलपासून 215 किलोमीटर अंतरावर होते.